Mumbai Rani Baug Penguin : राणीबागेतील पेंग्विन कक्षाची जबाबदारी पुन्हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवरच

मुंबई : महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेग्विन कक्ष पेंग्विन आरोग्य व्यवस्थापन प्रणालीची देखभाल करण्यासाठी एकही कंत्राटदार कंपनीपुढे येत नसून पुन्हा एकदा या पेंग्विन पिंजऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवरच सोपवण्यात आली आहे. पुढील ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून यासाठी तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च देखभालीवर केला जाणार आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात १८ मार्च २०१७ पासून हंबोल्ट पेंग्विन कक्ष सुरू करण्यात आला. हे हंबोल्ट पेंग्विन पक्षी परदेशातून आयात करून प्रथमच भारतात आणले गेले.



महापालिकेकडे हंबोल्ट पेंग्विन हाताळणी व व्यवस्थापन करण्याकरिता लागणारा तज्ञ कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने हंवोल्ट पेंग्विन व हंबोल्ट पेंग्विन कक्षाचे देखभाल आणि देखरेख तसेच आरोग्य व्यवस्थापन करण्याकरीता ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी यापूर्वी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी निवड करण्यात आली होती, या कंपनीचा कालावधी संपुष्टात आल्याने आता पुढील तीन वर्षांकरता नव्याने निविदा मागवली होती; परंतु या निविदेमध्ये पुन्हा एकदा एकमेव हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीनेच भाग घेतला आहे. या व्यतिरिक्त एकही कंपनी पुढे आली नाही. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने एक टक्का कमी दर आकारुन बोली लावली असून या कंपनीची पुढील तीन वर्षांकरता निविड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी' मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस