Mumbai Airport : धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ

मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनलवर एक धक्कादायक घटना घडली आहे. टर्मिनल २ वर एका कचऱ्याच्या डब्यात नवजात बाळ सापडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार, २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी त्वरित बाळाला पुढील उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बाळाला येथे कोणी व का सोडले याचा शोध घेतला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनल २ मधील सुरक्षा कर्मचाऱ्यांना मंगळवार, २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता एका कचऱ्याच्या डब्यात हालचाल जाणवली. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना एका नवजात बाळाचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आणि वैद्यकीय पथकाला पाचारण केले. बाळ अत्यंत अशक्त स्थितीत होते, त्यामुळे त्याला तातडीने कूपर रुग्णालयात हलवण्यात आले.



https://prahaar.in/2025/03/26/maharashtra-tops-the-country-in-the-field-of-data-centers-startups-and-innovation/


मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासाअंती विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांचा अंदाज आहे की, कोणीतरी बाळाला सोडून निघून गेले असावे.यामुळे पोलिसांनी त्वरित बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी परिसरातील रुग्णालये, महिलांसाठी असलेली निवासस्थाने आणि विमानतळावरून निघालेल्या प्रवाशांची यादी तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मुंबईतील अनाथालये आणि सामाजिक संस्थांकडूनही माहिती घेतली जात आहे.


याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास वेगाने सुरू आहे. बाळाच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवले जात असून, त्याला योग्य वैद्यकीय मदत दिली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र 'नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन होणार; मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आता एक मोठे पाऊल

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडीचा चेहरामोहरा बदलणार; गृहनिर्माण प्रकल्पांना मिळणार वेग

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे

एसअँडपीने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७.१ टक्क्यांपर्यंत वाढवला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील. एस अँड पी

डिजिटल माध्यमांवरील महिलांची बदनामी आता 'लैंगिक गुन्हा'

- 'भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६' विधानसभेत सादर; 'शक्ती' कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा

दोन खाजगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के जागा राखीव; कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची गरज ओळखून नव्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी कांदा प्रश्न बाबत विधानभवनात