Mumbai Airport : धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ

मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनलवर एक धक्कादायक घटना घडली आहे. टर्मिनल २ वर एका कचऱ्याच्या डब्यात नवजात बाळ सापडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार, २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी त्वरित बाळाला पुढील उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बाळाला येथे कोणी व का सोडले याचा शोध घेतला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनल २ मधील सुरक्षा कर्मचाऱ्यांना मंगळवार, २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता एका कचऱ्याच्या डब्यात हालचाल जाणवली. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना एका नवजात बाळाचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आणि वैद्यकीय पथकाला पाचारण केले. बाळ अत्यंत अशक्त स्थितीत होते, त्यामुळे त्याला तातडीने कूपर रुग्णालयात हलवण्यात आले.



https://prahaar.in/2025/03/26/maharashtra-tops-the-country-in-the-field-of-data-centers-startups-and-innovation/


मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासाअंती विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांचा अंदाज आहे की, कोणीतरी बाळाला सोडून निघून गेले असावे.यामुळे पोलिसांनी त्वरित बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी परिसरातील रुग्णालये, महिलांसाठी असलेली निवासस्थाने आणि विमानतळावरून निघालेल्या प्रवाशांची यादी तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मुंबईतील अनाथालये आणि सामाजिक संस्थांकडूनही माहिती घेतली जात आहे.


याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास वेगाने सुरू आहे. बाळाच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवले जात असून, त्याला योग्य वैद्यकीय मदत दिली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या