दिल्लीत ३० एप्रिल ते १ मे पर्यंत साजरा होणार अस्सल हापूस आंबा महोत्सव

नवी दिल्ली : दिल्लीकरांना लवकर अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. शहरातील उत्तर पश्चिम मतदारसंघाचे शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेने दिल्लीत आंबा महोत्सव साजरा होणार आहे.या आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार वायकरांनी दिली.


दिल्लीतील आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधानांना आंबा महोत्सवाला येण्याचं अधिकृत निमंत्रण दिले. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदार यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले.


दरम्यान, पंतप्रधानांसोबतच्या या भेटीत प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं. कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी यासाठी आंबा महोत्सवाचं दिल्लीत आयोजन केले आहे.


याचसोबत वायकरांनी पंतप्रधानांसोबतच्या या भेटीत शहरातील पाणी प्रश्नाबाबतही लक्ष वेधले. मुंबईतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन गारगाई-पिंजाळ प्रकल्प पूर्ण करण्यात यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच एम्सच्या धर्तीवर मुंबईत एक रुग्णालय सुरू करण्यात यावे यामध्ये कॅन्सर रुग्णांवर उपचाराची सुविधा करण्यात यावी अशी विनंती खासदार वायकर यांनी पंतप्रधानांकडे केली.

Comments
Add Comment

India France Relations : फ्रान्स हा भारताच्या सर्वात विश्वासू आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

फ्रान्स हा भारताचा सर्वात विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक आहे असे सांगत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

CBSE Class 10 2026 : CBSE १० वी निकाल जाहीर! आता दुसऱ्या बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी सुरू; जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तारखा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ च्या इयत्ता १० वीच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी

Amarnath Yatra 2026 : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात; घरबसल्या नोंदणी प्रक्रियाही सुरू

श्रीनगर : देशातील सर्वात कठीण आणि तितकीच श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा यंदा लवकरच सुरू होत आहे. हिमालयातील

'Jag Vikram' LPG Ship : होर्मुज तणावात दिलासा; ‘जग विक्रम’ एलपीजी जहाज सुरक्षित कांडला बंदरात दाखल

होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’

Overloaded Vehicles : महामार्गांवर ओव्हरलोड वाहनांना बसणार दणका; २ ते ४ पट अधिक शुल्क

नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Mangaluru News : मंगरूळमध्ये भीषण आग; निर्भवणे कुटुंबाचा संसार जळून खाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना; लाखांचे नुकसान चांदवड : एकीकडे भारतरत्न डॉ.