World Meteorological Day : झाडांशी सलोखा जपू या...

मुंबई (मानसी खांबे) : २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मानव जातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. २३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संस्था स्थापन झाली होती. दरवर्षी जागतिक हवामान दिनाची थीम वेगवेगळी ठरविण्यात येते. त्यानुसार यंदाची थीम "Closing the early warning gap together" ही आहे. गेल्या काही वर्षांत, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, दुष्काळ, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटा यासारख्या नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल तीव्र होत चालला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून यंदा हवामान बदल आणि अत्यंत हवामान घटनांचे परिणाम कमी करण्यासाठी लवकर इशारा प्रणालींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे.
अलिकडच्या काही वर्षांत मुंबईतील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सूर्य देव आग ओकत आहे. दुपारच्या सुमारास उष्णतेच्या लाटा अगांची अक्षरश: लाहीलाही करतात. उन्हाळा ऋतुही वाढत आहे. तुलनेत हिवाळा ऋतू अगदीच कमी होत चालला आहे. राज्यात अवकाळी धुमाकूळ घालत आहे. ग्लोबल वार्मिंगचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. तापमान वाढीमुळे शहरे होरपळत आहेत.



जगात शहरीकरणाची जणू स्पर्धाच रंगली आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या शहरांचा माग अविकसित, विकसनशील देशांतील शहरे घेत आहेत. जगात अशी चकचकीत शहरेच्या शहरे विकसित केली जात आहेत. शहरीकरणाच्या या पाठलागात वनीकरणावर कुऱ्हाड चालवली जात आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंचच्या उंच इमारती, काचेची घरे, महामार्ग, मेट्रो रेल्वे यांच्या उभारणीत झाडांची कत्तल केली जात आहे. जलद आणि सोयीस्कर महामार्ग बांधताना समुद्र, पृथ्वीच्या पोटात हात घातला जात आहे. औद्योगीकरणात झपाट्याने वाढ होत असताना प्रदूषणातही वाढ होत आहे. बांधकाम, इमारतीकरण, वाहतुकीची साधने यामुळे हवा प्रदूषणात भर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वर्षागणीक वाढ होत आहे. जल प्रदूषण रोखण्यात अनेक देश अपयशी ठरत आहेत. त्याचे परिणाम हवामान बदलात दिसत आहेत. त्यामुळे आता तरी डोळे उघडा. वृक्षतोड थांबवा.


झाडे रुजून येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी किमान माती असणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरात माती शिल्लक आहे कुठे. मुंबई म्हणजे सिमेंट काँक्रीटचे जंगल झाले आहे. हा काँक्रीटचा विस्तार थांबवा. शक्य तितका भाग मातीचा राहुदे. मग त्यात पावसाचे पाणीही मुरेल. जपानच्या धर्तीवर मियवाकी ही कमीत कमी जागेतली घनदाट जंगले तयार करुया. प्रगती करताना पर्यावरणाशी सांगड घालूया. प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करू या. झाडे हा पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. त्याला आपल्या आप्तेष्टांप्रमाणे जपू या. त्याचा परिणाम हमखास पर्यावरणावर होईल. अन्यथा अवकाळी, तापमानवाढ हे पर्यावरणाचे इशारे आहेत. ते वेळीच ऐकले नाहीत, तर पुढे अधिक घातक होईल.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर