आयपीएल स्पर्धेत एका सामन्यात वापरणार तीन चेंडू

मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रिमिअर लीग २०२५ हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सामन्यातील चेंडू वापराबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू होण्यास २ दिवस शिल्लक असताना मुंबईमध्ये आयपीएल संघांच्या कर्णधारांसोबत बीसीसीआयने बैठक घेतली. या बैठकीत गोलंदाजांना फायदेशीर ठरणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर एका सामन्यात तीन चेंडूंचा वापर करण्यात येणार आहे.



आयपीएल मधील सामन्यात आता एकूण ३ नव्या चेंडूंचा वापर होणार आहे. या आधी सामन्यातील २ डावांसाठी २ नवे चेंडू मिळायचे. पण आता धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला २ चेंडूसह खेळावे लागणार आहे. नव्या नियमानुसार दुसऱ्या डावासाठी २ चेंडू देण्यात येणार आहे, ज्यापैकी दुसरा चेंडू ११ व्या षटकांनतर चेंडू वापरण्यात येईल. हा नियम रात्रीच्या सामन्यांमध्ये दवामुळे होणारा परिणाम टाळण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे दव घटकामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाला होणारा फायदा आता मिळणार नाही.

चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी उठली

चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे चेंडू चमकवण्यासाठी आता गोलंदाजांना आता लाळेची मदत घेता येणार आहे. मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत नियम हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर बीसीसीआयकडून यावर सकारात्मक विचार करण्यात आला व आगामी आयपीएल हंगामात आता हा नियम हटवण्यात आला आहे. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यानंतर शमी म्हणाला होता की, ‘आम्ही नेहमीच अधिकाऱ्यांना लाळेचा वापर करण्यासाठी परवानगीची विनंती करत असतो. जेणेकरून सामन्यांदरम्यान स्विंग आणि रिव्हर्सचा वापर करता येईल. शमीच्या या विनंतीचे व्हर्नान फिलँडर आणि टिम साउथी सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही समर्थन केले होते. कोविड-१९ साथीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्याच्या जुन्या पद्धतीवर बंदी घातली होती. २०२२ मध्ये, आयसीसीने ही बंदी कायम ठेवली. आयसीसीप्रमाणे बीसीसीआयने देखील आयपीएलमध्येही हा नियम लागू केला होता. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांना चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार आहे.
Comments
Add Comment

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी

भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा