आयपीएल स्पर्धेत एका सामन्यात वापरणार तीन चेंडू

मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रिमिअर लीग २०२५ हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सामन्यातील चेंडू वापराबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू होण्यास २ दिवस शिल्लक असताना मुंबईमध्ये आयपीएल संघांच्या कर्णधारांसोबत बीसीसीआयने बैठक घेतली. या बैठकीत गोलंदाजांना फायदेशीर ठरणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर एका सामन्यात तीन चेंडूंचा वापर करण्यात येणार आहे.



आयपीएल मधील सामन्यात आता एकूण ३ नव्या चेंडूंचा वापर होणार आहे. या आधी सामन्यातील २ डावांसाठी २ नवे चेंडू मिळायचे. पण आता धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला २ चेंडूसह खेळावे लागणार आहे. नव्या नियमानुसार दुसऱ्या डावासाठी २ चेंडू देण्यात येणार आहे, ज्यापैकी दुसरा चेंडू ११ व्या षटकांनतर चेंडू वापरण्यात येईल. हा नियम रात्रीच्या सामन्यांमध्ये दवामुळे होणारा परिणाम टाळण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे दव घटकामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाला होणारा फायदा आता मिळणार नाही.

चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी उठली

चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे चेंडू चमकवण्यासाठी आता गोलंदाजांना आता लाळेची मदत घेता येणार आहे. मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत नियम हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर बीसीसीआयकडून यावर सकारात्मक विचार करण्यात आला व आगामी आयपीएल हंगामात आता हा नियम हटवण्यात आला आहे. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यानंतर शमी म्हणाला होता की, ‘आम्ही नेहमीच अधिकाऱ्यांना लाळेचा वापर करण्यासाठी परवानगीची विनंती करत असतो. जेणेकरून सामन्यांदरम्यान स्विंग आणि रिव्हर्सचा वापर करता येईल. शमीच्या या विनंतीचे व्हर्नान फिलँडर आणि टिम साउथी सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही समर्थन केले होते. कोविड-१९ साथीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्याच्या जुन्या पद्धतीवर बंदी घातली होती. २०२२ मध्ये, आयसीसीने ही बंदी कायम ठेवली. आयसीसीप्रमाणे बीसीसीआयने देखील आयपीएलमध्येही हा नियम लागू केला होता. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांना चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार आहे.
Comments
Add Comment

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने