Mumbai Indiansने आयपीएल २०२५साठी लाँच केले नवे गाणे, पाहा Video

Share

मुंबई: मुंबई इंडियन्सने(Mumbai Indians) गुरूवारी आपले नवे गाणे जाहीर केले. यात मै नही तो कौन बे यावरून फेमस झालेल्या सृष्टी तावडेने आवाज दिला आहे. तर बॉलिवूडचे अभिनेते जॅकी श्रॉफही यात दिसत आहे. गाण्यामध्ये रोहित शर्माची धांसू एँट्री आहे. या गाण्यातील मुख्य ओळी आहेत, प्ले लाईक मुंबई.

मुंबई इंडियन्स(Mumbai Indians)चा संघ आयपीएल २०२५मध्ये आपला पहिला सामना २३ मार्चला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात डबल हेडरचा दुसरा सामना असेल. हा सामना एमए चिदम्बरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. आयपीएल सुरू होण्याच्या २ दिवस आधी गुरूवारी २० मार्चला मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने आपले अँथम साँग लाँच केले आहे.

 

पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व

हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा रविवारी होणारा सामना खेळणार नाही. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने अधिकृतपणे सांगितले की पहिल्या सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार.

रोहितच्या नेतृत्वात मुंबईला ५ वेळा जेतेपद

मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्ससोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. दोघांनी ५-५ आयपीएलची जेतेपदे मिळवली आहेत. रोहितच्या नेतृत्वा मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) ने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२०मध्ये जेतेपद मिळवले आहे.

Recent Posts

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

4 minutes ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

19 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

34 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

44 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

1 hour ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago