Mumbai Indiansने आयपीएल २०२५साठी लाँच केले नवे गाणे, पाहा Video

मुंबई: मुंबई इंडियन्सने(Mumbai Indians) गुरूवारी आपले नवे गाणे जाहीर केले. यात मै नही तो कौन बे यावरून फेमस झालेल्या सृष्टी तावडेने आवाज दिला आहे. तर बॉलिवूडचे अभिनेते जॅकी श्रॉफही यात दिसत आहे. गाण्यामध्ये रोहित शर्माची धांसू एँट्री आहे. या गाण्यातील मुख्य ओळी आहेत, प्ले लाईक मुंबई.


मुंबई इंडियन्स(Mumbai Indians)चा संघ आयपीएल २०२५मध्ये आपला पहिला सामना २३ मार्चला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात डबल हेडरचा दुसरा सामना असेल. हा सामना एमए चिदम्बरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. आयपीएल सुरू होण्याच्या २ दिवस आधी गुरूवारी २० मार्चला मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने आपले अँथम साँग लाँच केले आहे.


 


पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व


हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा रविवारी होणारा सामना खेळणार नाही. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने अधिकृतपणे सांगितले की पहिल्या सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार.



रोहितच्या नेतृत्वात मुंबईला ५ वेळा जेतेपद


मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्ससोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. दोघांनी ५-५ आयपीएलची जेतेपदे मिळवली आहेत. रोहितच्या नेतृत्वा मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) ने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२०मध्ये जेतेपद मिळवले आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण