Mumbai Indiansने आयपीएल २०२५साठी लाँच केले नवे गाणे, पाहा Video

मुंबई: मुंबई इंडियन्सने(Mumbai Indians) गुरूवारी आपले नवे गाणे जाहीर केले. यात मै नही तो कौन बे यावरून फेमस झालेल्या सृष्टी तावडेने आवाज दिला आहे. तर बॉलिवूडचे अभिनेते जॅकी श्रॉफही यात दिसत आहे. गाण्यामध्ये रोहित शर्माची धांसू एँट्री आहे. या गाण्यातील मुख्य ओळी आहेत, प्ले लाईक मुंबई.


मुंबई इंडियन्स(Mumbai Indians)चा संघ आयपीएल २०२५मध्ये आपला पहिला सामना २३ मार्चला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात डबल हेडरचा दुसरा सामना असेल. हा सामना एमए चिदम्बरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. आयपीएल सुरू होण्याच्या २ दिवस आधी गुरूवारी २० मार्चला मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने आपले अँथम साँग लाँच केले आहे.


 


पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व


हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा रविवारी होणारा सामना खेळणार नाही. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने अधिकृतपणे सांगितले की पहिल्या सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार.



रोहितच्या नेतृत्वात मुंबईला ५ वेळा जेतेपद


मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्ससोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. दोघांनी ५-५ आयपीएलची जेतेपदे मिळवली आहेत. रोहितच्या नेतृत्वा मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) ने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२०मध्ये जेतेपद मिळवले आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि