दोघेही भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर सुरक्षित लँड झाले. ९ महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर त्यांचे पृथ्वीवर परणे हे ऐतिहासिक आहे.
सुनीता विल्यम्स ९ महिन्यांनंतर पृ्थ्वीवर परतल्याची बातमी ऐकताच गुजरातमधील तिच्या गावात एकच जल्लोष करण्यात आला.
सुनीता विल्यम्सच्या परतण्याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की , गौरव, गर्व आणि दिलासाचा क्षण! संपूर्ण जग या भारताच्या मुलीच्या सुरक्षित परतण्याबद्दल जल्लोष करण्यासाठी एकत्र आले आहे. अंतराळातील अनिश्चितता सहन कऱण्याचे साहस, दृढ विश्वास आणि स्थिरता याची इतिहासात नोंद होईल.