ऑनलाईन-गेमिंगच्या १०९७ साईटस बंद, अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंगच्या समस्येबाबत केंद्र सरकार अतिशय गंभीर आहे. आतापर्यंत 1097 ऑनलाईन गेमिंग साईटस बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी लोकसभेत दिली.


प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, राज्य सरकारांशी समन्वय साधून ऑनलाइन गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. संवैधानिक तरतुदींनुसार, आम्ही या समस्येतून मुक्त होण्यासाठी राज्य सरकारांसोबत जलदगतीने काम करू. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने यावर काम करत आहे. त्यांनी सांगितले की नियामक संस्था या प्रकरणात चांगले काम करू शकते.


ऑनलाइन गेमिंगच्या तावडीतून लोकांना, विशेषतः मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात, १०९७ ऑनलाइन गेमिंग साइट्स बंद करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांच्या दुष्परिणामांबद्दल लोक जागरूक होत आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे समाजात सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला