Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहील बंद

ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना ठाणेकरांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. ठाणेकरांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, तातडीचे आणि अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार दि. १७/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० पासून ते मंगळवार दि. १८/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


तसेच, मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

Bhoot Bangla : धुरंधर २ सिनेमामुळे अक्षयचा 'भूत बंगला' पुन्हा लांबणीवर जाणार ?

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. अक्षय कुमारचा भूत बंगला या

Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा

Matka King : विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज, १७ एप्रिलला रिलीज होणार ‘मटका किंग’

मुंबई : अभिनेता विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात लोकप्रिय प्राईम व्हिडिओनं विजयच्या आगामी

Rakesh Bedi : धुरंधर २ मधील जमील जमाली साकारण्याआधी राकेश बेदीच्या 'या' भूमिकांनी जिंकली होती प्रेक्षकांची मने

मुंबई : काहीवेळा एखाद्या अभिनेत्याला आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी एक दमदार अभिनय पुरेसा असतो. धुरंधर २

Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ.