ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजठाणे

Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहील बंद

  110

ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना ठाणेकरांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. ठाणेकरांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, तातडीचे आणि अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार दि. १७/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० पासून ते मंगळवार दि. १८/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


तसेच, मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

Tata Motors: टाटा मोटर्सने २१.४९ लाखांत हॅरियर.इव्ही लॉन्च केली

१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमीची रेंज मुंबई: भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीत देशातील आघाडीचा

Pakistan Brahmaputra Water Threat : ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याची पाकिस्तानची नापाक रणनीती!

पाकची धमकी, भारताकडून वाटाण्याच्या अक्षता भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं तरी पाण्यावरून सुरू झालेलं

Stock Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: एका सत्राअखेरीस गुंतवणूकदारांची २ लाख कोटींची कमाई

मोहित सोमण: सकाळचा वेग इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने कायम राखल्याने अखेरचे सत्र संपताना शेअर बाजारात किंचित