Airtel : एअरटेलच्या गॅलरीत भाषेवरुन वाद; कर्मचाऱ्याची अरेरावी!

  96

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेवरुन वाद होत असल्याचे अनेक प्रकारण उघडकीस आले आहे. रेल्वे तिकीट काउंटरसह इतर ठिकाणी परप्रांतियांकडून मराठी बोलण्यावरुन हुज्जत घालत असल्याचे समोर आले आहे. त्यानतर आता मुंबईत एअरटेल (Airtel Gallery Viral Video) कस्टमर केअरमध्येही मराठी भाषेवरुन वाद निर्माण झाला आहे.



कांदिवलीतील चारकोपमधील एका ऐअरटेल स्टोअरमधील महिला कर्मचाऱ्याने मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्याला 'मराठी येत नाही. का मराठी आली पाहिजे ती महत्वाची नाही' अशा प्रकारची उत्तरे दिली आहेत. या घटनेचा व्हिडिओ काढला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



नेमकं प्रकरणं काय?


कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता. त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केले. संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितले असता तिने हिंदीतून आरडा ओरडा सुरू केला. त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यात तिने उद्दामपणा केला.


तरुणाने काढलेल्या व्हिडिओमध्ये त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितले त्यावेळी तिने उडवा उडवीची उत्तर दिली. ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोलले पाहिजे. त्या तरुणाने मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती हुज्जत घालत म्हणाली की, का आले पाहिजे मराठी, कुठे लिहिले आहे (क्यू आना चाहिए मराठी, कहाँ पे लिखा हूआ है) तसेच त्यानंतर त्याने प्रश्न विचारल्यास त्यास हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले. मला समजत नाही हिंदींमध्ये बोल असे सांगितले. आपण हिंदुस्थानात राहतो. कोणतीही भाषा बोलू शकतो. मराठी महत्त्वाची नाही आहे.असे म्हटले.


Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील