Airtel : एअरटेलच्या गॅलरीत भाषेवरुन वाद; कर्मचाऱ्याची अरेरावी!

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेवरुन वाद होत असल्याचे अनेक प्रकारण उघडकीस आले आहे. रेल्वे तिकीट काउंटरसह इतर ठिकाणी परप्रांतियांकडून मराठी बोलण्यावरुन हुज्जत घालत असल्याचे समोर आले आहे. त्यानतर आता मुंबईत एअरटेल (Airtel Gallery Viral Video) कस्टमर केअरमध्येही मराठी भाषेवरुन वाद निर्माण झाला आहे.



कांदिवलीतील चारकोपमधील एका ऐअरटेल स्टोअरमधील महिला कर्मचाऱ्याने मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्याला 'मराठी येत नाही. का मराठी आली पाहिजे ती महत्वाची नाही' अशा प्रकारची उत्तरे दिली आहेत. या घटनेचा व्हिडिओ काढला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



नेमकं प्रकरणं काय?


कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता. त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केले. संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितले असता तिने हिंदीतून आरडा ओरडा सुरू केला. त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यात तिने उद्दामपणा केला.


तरुणाने काढलेल्या व्हिडिओमध्ये त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितले त्यावेळी तिने उडवा उडवीची उत्तर दिली. ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोलले पाहिजे. त्या तरुणाने मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती हुज्जत घालत म्हणाली की, का आले पाहिजे मराठी, कुठे लिहिले आहे (क्यू आना चाहिए मराठी, कहाँ पे लिखा हूआ है) तसेच त्यानंतर त्याने प्रश्न विचारल्यास त्यास हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले. मला समजत नाही हिंदींमध्ये बोल असे सांगितले. आपण हिंदुस्थानात राहतो. कोणतीही भाषा बोलू शकतो. मराठी महत्त्वाची नाही आहे.असे म्हटले.


Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा