फसवणूक करणाऱ्याला एकनाथ शिंदेंचा दणका, शिवसेनेतून हाकलले

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मुंबईतील नेत्याची हकालपट्टी केली. लालसिंह राजपुरोहित यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शिवसेनेच्या शिस्तभंग समितीने ही कारवाई केली. कांदिवलीतील दाम्पत्याची फसवणूक केल्याप्रकरणी लालसिंह राजपुरोहित यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाई केली.



लवकरच शिवसेनेचे पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित यांनी ज्यांची फसवणूक केली त्या कांदिवलीतील दाम्पत्याला भेटणार आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे. तर पोलीस कायद्यातील तरतुदींनुसार लालसिंह राजपुरोहित यांच्याविरोधात कारवाई करत आहेत.

राज्याची राजधानी असूनही मुंबईत राजकीय गुंडगिरी सुरू आहे. कांदिवलीच्या दाम्पत्याचे दुकान फसवणूक करुन हडपण्यात आले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. तसेच लालसिंह राजपुरोहित विरोधात कारवाईची मागणी केली होती. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाई केली. लालसिंह राजपुरोहित विरोधात पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केल्याचे कळताच त्याला पक्षातून हालकून देण्यात आले.



लालसिंह राजपुरोहित आणि त्यांचे २० ते २५ समर्थक संघटीतपणे सामान्यांची फसवणूक करतात. लोकांची घरं-ऑफिस-दुकान -झोपडी-जमिनी बळकावणे हाच त्यांचा उद्योग झाला आहे. फसवणूक प्रकरणात पोलीस गुन्हे नोंदवतात पण कारवाई करत नाहीत. यामुळे आधी लालसिंह राजपुरोहितची पक्षातून हकालपट्टी करावी. नंतर या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. या मागणीची दखल घेण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालसिंह राजपुरोहित याची शिवसेनेतून हकालपट्टी केली.
Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक