फसवणूक करणाऱ्याला एकनाथ शिंदेंचा दणका, शिवसेनेतून हाकलले

  83

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मुंबईतील नेत्याची हकालपट्टी केली. लालसिंह राजपुरोहित यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शिवसेनेच्या शिस्तभंग समितीने ही कारवाई केली. कांदिवलीतील दाम्पत्याची फसवणूक केल्याप्रकरणी लालसिंह राजपुरोहित यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाई केली.



लवकरच शिवसेनेचे पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित यांनी ज्यांची फसवणूक केली त्या कांदिवलीतील दाम्पत्याला भेटणार आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे. तर पोलीस कायद्यातील तरतुदींनुसार लालसिंह राजपुरोहित यांच्याविरोधात कारवाई करत आहेत.

राज्याची राजधानी असूनही मुंबईत राजकीय गुंडगिरी सुरू आहे. कांदिवलीच्या दाम्पत्याचे दुकान फसवणूक करुन हडपण्यात आले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. तसेच लालसिंह राजपुरोहित विरोधात कारवाईची मागणी केली होती. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाई केली. लालसिंह राजपुरोहित विरोधात पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केल्याचे कळताच त्याला पक्षातून हालकून देण्यात आले.



लालसिंह राजपुरोहित आणि त्यांचे २० ते २५ समर्थक संघटीतपणे सामान्यांची फसवणूक करतात. लोकांची घरं-ऑफिस-दुकान -झोपडी-जमिनी बळकावणे हाच त्यांचा उद्योग झाला आहे. फसवणूक प्रकरणात पोलीस गुन्हे नोंदवतात पण कारवाई करत नाहीत. यामुळे आधी लालसिंह राजपुरोहितची पक्षातून हकालपट्टी करावी. नंतर या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. या मागणीची दखल घेण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालसिंह राजपुरोहित याची शिवसेनेतून हकालपट्टी केली.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.