पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना नोटीस

जयपूर : बॉलीवूड स्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे नोटीस जारी करण्यात आली आहे.जयपूर ग्राहक वाद निवारण मंचाने या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस बजावली आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीबाबत ही सूचना जारी करण्यात आली आहे.पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी या कलाकारांवर आधीच बरीच टीका झाली आहे. आता हे तिघेही या प्रकरणाबाबत कायदेशीर अडचणीत अडकले आहेत.


जयपूरचे रहिवासी योगेंद्र सिंह यांच्या तक्रारीवरून आयोगाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीणा आणि सदस्या हेमलता अग्रवाल यांनी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या तिघांनी 'विमल पान मसाल्या'ची जाहिरात केली आहे जी 'बोलो जुबा केसरी' या टॅगलाइनसह येते. या जाहिरातीत असा दावा केला आहे की, पान मसाल्याच्या प्रत्येक दाण्यात केशर असते. जाहिरातीत तिन्ही कलाकार 'दाने-दाने में केसर का दम' असे म्हणताना दिसतात.त्यांनी असेही सांगितले की, या तिन्ही अभिनेत्यांना मोठी चाहतावर्ग आहे आणि अनेक तरुण त्यांना रोल मॉडेल मानतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशा भ्रामक प्रचाराची अपेक्षा करता येत नाही.


याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, केशराची किंमत लाखो रुपये प्रति किलो असते, तर या पान मसाल्याची किंमत फक्त 5 रुपये आहे. त्यामुळे या उत्पादनात केशर असणे तर दूरच, त्याचा सुगंधही शक्य नाही. शिवाय, असे पदार्थ कॅन्सरला प्रोत्साहन देतात, त्यामुळे या जाहिरातीवर त्वरित बंदी घालावी.


या प्रकरणाची सुनावणी १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. आयोगाने जारी केलेल्या नोटिशीनुसार, या तिन्ही अभिनेत्यांना ३० दिवसांच्या आत आपली बाजू मांडावी लागेल.

Comments
Add Comment

Rohit Shetty : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा मुख्य आरोपी आगऱ्यातून अटकेत

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या जुहू येथील घरावर गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या

Sapne Vs Everyone : प्राइम व्हिडिओने ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नवीन सीझनची जागतिक रिलीज डेट १ मे ठरवली

महत्त्वाकांक्षा आणि बदला यावर आधारित एक रोमांचक ड्रामा मुंबई : भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय एंटरटेनमेंट

Bigg Boss Marathi 6 : ग्रँड फिनाले सोहळा १९ एप्रिल रोजी

मुंबई : शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपणार, अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळणार. आता

अडाणीपणाचा कळस झाला! आशाताईंन ऐवजी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली; ही अभिनेत्री झाली प्रचंड ट्रोल

मुंबई : ९० च्या काळात संपूर्ण मनोरंजन विश्वाला, चाहत्यांना आपल्या आवाजाचे वेड लावणाऱ्या स्वरस्वामींनी आशा भोसले

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल