एका वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच

वाढते अपघाताचे प्रमाण; बेशिस्त वाहनचालक


तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या वर्षभरापासून काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के महामार्गावर काँक्रीट करण्याचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही उड्डाणपूल, सेवा रस्ते असे काम बाकी आहे.


महामार्गावरील अपघात कमी व्हावेत व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काँक्रिटीकरण करण्यात येत असले तरी कामाचे नियोजन नसणे व हलगर्जीपणा यामुळे गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक नागरिकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहेत. चारोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये मेंढवन खिंड ते अच्छाड असा ५१ किलोमीटरचा महामार्ग येतो.



गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या भागात १०५ अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये ५७ नागरिकांना आपले जीव गमवावा लागला तर ४४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मेंढवन, चारोटी, महालक्ष्मी, धानिवरी, आंबोली, तलासरी उड्डाणपूल, सूत्रकार फाटा अशा विविध ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर अपघात होण्यामागे सर्वात मोठे कारण हे अनेक ठिकाणी असलेले अपूर्ण काम व वाहनचालकांचा बेशिस्तपणा असल्याचे दिसून येत आहे.


महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी महामार्ग पोलीस बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करतात. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत विरुद्ध बाजूने वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे अशा विविध १५ हजार सहाशे वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यामधून ४५ लक्ष रुपये दंड आकारण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असली तरीही मात्र अपघातांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.


वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी विविध ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सुद्धा वाहनचालकांना सहन करावा लागत आहे, अपघात होत आहेत तरीसुद्धा टोल मात्र वसूल केला जात आहे.


एप्रिल २०२४ पासून महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १५ हजार सहाशे वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यामधून जवळपास ४५ लक्ष दंड आकारण्यात आला आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. - विजय पराड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग)

Comments
Add Comment

करण जोहरला अचानक काय झालं ? शाहरुख, आलिया, करिना अन मनीष मल्होत्रालाही केलं अनफॉलो

Karan Johar : चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. करण

Thalapathy Vijay : थलपती विजयचा मुलगा करणार चिटपटसृष्टीत पदार्पण 'या' तारखेला रिलीज होणार पहिला चित्रपट!

थलपती विजय हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे नाव. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. राजकारणात प्रवेश

KGF आणि Kantara चे मेकर्स आता मराठी हिप-हॉपच्या दुनियेत; ‘येतो का नाय - पहिला वार’ची अनाउन्समेंट

मुंबई : गेल्या काही वर्षांत भारतीय सिनेमाला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे देशातील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस

विसरण्याचं टेन्शन विसरा, सगळं लक्षात ठेवा; दररोज फक्त १० ब्रेन एक्सरसाईझ करा

आजकालची मुलं खूप अभ्यास करतात, पण काही वेळातच सगळं विसरून जातात. त्यामुळे केवळ अभ्यास करून उपयोग नाही, तर लक्षात

Ranveer Singh : रणवीर-फरहानच्या वादात आता सलमान खानचा प्रवेश, आता 'भाईजान' काढणार का यावर तोडगा ?

अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) आणि फरहान अख्तर(Farhaan Akhtar) यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आता सलमान खानने पुढाकार घेतल्याची

क्षुल्लक वादा वरून प्रियकराणे प्रियसीला केली मारहाण . . .

पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे . एका प्रियकराने आपल्या प्रियसीला एका कपड्या च्या दुकानात