एका वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच

वाढते अपघाताचे प्रमाण; बेशिस्त वाहनचालक


तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या वर्षभरापासून काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के महामार्गावर काँक्रीट करण्याचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही उड्डाणपूल, सेवा रस्ते असे काम बाकी आहे.


महामार्गावरील अपघात कमी व्हावेत व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काँक्रिटीकरण करण्यात येत असले तरी कामाचे नियोजन नसणे व हलगर्जीपणा यामुळे गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक नागरिकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहेत. चारोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये मेंढवन खिंड ते अच्छाड असा ५१ किलोमीटरचा महामार्ग येतो.



गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या भागात १०५ अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये ५७ नागरिकांना आपले जीव गमवावा लागला तर ४४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मेंढवन, चारोटी, महालक्ष्मी, धानिवरी, आंबोली, तलासरी उड्डाणपूल, सूत्रकार फाटा अशा विविध ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर अपघात होण्यामागे सर्वात मोठे कारण हे अनेक ठिकाणी असलेले अपूर्ण काम व वाहनचालकांचा बेशिस्तपणा असल्याचे दिसून येत आहे.


महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी महामार्ग पोलीस बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करतात. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत विरुद्ध बाजूने वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे अशा विविध १५ हजार सहाशे वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यामधून ४५ लक्ष रुपये दंड आकारण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असली तरीही मात्र अपघातांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.


वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी विविध ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सुद्धा वाहनचालकांना सहन करावा लागत आहे, अपघात होत आहेत तरीसुद्धा टोल मात्र वसूल केला जात आहे.


एप्रिल २०२४ पासून महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १५ हजार सहाशे वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यामधून जवळपास ४५ लक्ष दंड आकारण्यात आला आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. - विजय पराड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग)

Comments
Add Comment

Healthy lifestyle : रात्री ही फळे खाण्याची चूक तर करत नाही ना? जाणून घ्या सत्य!

सर्वसाधारणपणे रात्री फळे खाणे वाईट नाही. मात्र काही फळे काही लोकांना अपचन, अॅसिडिटी किंवा झोपेचा त्रास देऊ शकतात.

Tiger Population : भारत वाघ संवर्धनात जगात अव्वल; देशात वाघांची संख्या ३,६८२ वर

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, वाघ संवर्धनाच्या

Pratika Rawal : प्रतिका रावल इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार

नवी दिल्ली : इंग्लिश काउंटी क्लब वॉरविकशायर बेअर्सने भारतीय सलामीवीर प्रतिका रावलला २०२६ च्या देशांतर्गत

Nashik Crime : १३ लाखांच्या बिलासाठी ४८ हजारांची लाच ! इगतपुरीत ग्रामसेवकासह तिघे ताब्यात

Nashik Crime : विकासकामांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत

Vanita Kharat : चाळीतील खिडकीतून पाहिलेलं स्वप्न पूर्ण! नवऱ्याच्या सरप्राइजने अभिनेत्री झाली भावूक; 'ताज' मध्ये ग्रँड बर्थडे सेलिब्रेशन

मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने

Action movie : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला १६०० कोटींचा सिनेमा, मात्र OTT वर येताच ठरला जगभरात नंबर वन!

मुंबई: चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची निराशा आणि बॉक्स ऑफिसवर अब्जावधींचा तोटा सोसल्यानंतर, एका मोठ्या