मिठी नदी सफाई कामांच्या निविदेतच घोटाळा; एसआयटी मार्फत चौकशीची मागणी

Share

मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर तसेच आजवर देण्यात आलेल्या सफाईच्या कामांबाबत मनसेने तीव्र आक्षेप नोंदवून आता काढण्यात आलेली निविदा रद्द करून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलतांना केली.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांना निवदेन देवून त्यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याबाबत तसेच मुंबईतील मोठ्या नाल्यातील सफाई कामांच्या निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. या निविदेनामध्ये बाळा नांदगावकर यांनी असे नमुद केले आहे की, हे नालेसफाईचे काम एकाच कंपनीला देण्याचा प्रयत्न असून यात डी बी एंटरप्रायझेसस एमएम रनोजा डेव्हलपमेंट कार्पौरेशन, त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट आणि तनिषा एंटरप्रायझेस यांनाच काम मिळेल अशाप्रकारचे या निविदेत अट घालण्यात आल्याचे म्हटले आहे.

मिठी नदीमध्ये शिल्टपुशर आणि स्टक्चलर आदींचा वापर केला जात असून या मशिनची मक्तेदारी केवळ एकाच कंपनीकडे आहे. या कंपनीला प्रत्येक कामांसाठी दोन वर्षांसाठी ९ कोटी रुपये द्यावे लागते आणि या मशिनची एनओसी ज्यांच्याकडे नसेल त्यांना काम मिळत नाही. त्यामुळे या शिल्टपुशर मशिनची अट घालून ठराविक कंपन्यांना काम देण्याचा आणि या मशिनच्या भाड्यापोटी जाणारे पैसे गृहीत धरता महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे केरळमध्ये जी मशिन ९० लाखांमध्ये मिळते, त्याच मशिनचे भाडे तीन विभागांमध्ये दिल्या जाणाऱ्या कंत्राट कामांमध्ये प्रत्येकी कंत्राटदारांकडून ९ कोटी रुपये घेतले जातात. त्यामुळे या मशिन्स महापालिकेने स्वत: खरेदी करून उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशाप्रकारची मागणीही नांदगावकर यांनी केली आहे. यासर्व प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी करावी तसेच फौजदारी गुन्हेही दाखल करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

29 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

29 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

31 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

43 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

48 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago