SRA scheme : एसआरए योजनेतील घर यापुढे पति-पत्नीच्या नावे होणार

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा महत्वाचा निर्णय


मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए - SRA scheme) घरावर यापुढे पति-पत्नी यांच्या संयुक्त नावाची नोंद होणार आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महानगरप्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत घेण्यात आला आहे.


महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतिच्या मालमत्तेमध्ये हक्क देणे ही मुलभूत गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पति-पत्नी यांना एकरूप एक घटक मानला जातो व प्राप्त संपत्ती दोघांची असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी त्यांच्या राहत्या घराची नोंद पति-पत्नी दोघांच्या नावे असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पतिच्या निधनानंतर पतिच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करताना महिलांना अनेक कायदेशिर अडचणींना सामोरे जावे लागते. जर आधीच पति-पत्नीचे हक्क झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-।। मध्ये असेल तर अशा अडचणी येणार नाहीत. यासाठी सुरूवात म्हणून पुर्नविकासानंतर मिळणारे घर हे पति आणि पत्नीच्या संयुक्त नावे करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेत प्राधिकरणाने आता संयुक्त मालकीवर शिक्कामोर्तब केला आहे.



झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सबलीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने अतिशय महत्त्व पुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निर्णयासंदर्भात परिपत्रक काढत प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झोपडपट्टीवासियांसाठी पुर्नविकासाअंतर्गत हा निर्णय लागू केला आहे.


प्राधिकरणाच्या या नव्या निर्देशानंतर सक्षम प्राधिकारी यांनी योजनेचे परिशिष्ट-2 निर्गमित करताना पति-पत्नी यांचे संयुक्त नावाने निर्गमित करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. परिशिष्ट-2 प्रमाणे पुनर्वसन इमारतीमध्ये सदनिका वितरित करतेवेळी सदनिका वाटपपत्रावर पति-पत्नी दोघांचे नाव नोंद करून सदनिका वितरीत करण्यात यावी. याव्यतिरिक्त सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनीही मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुनर्वसन योजनेतील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेस सदनिकाधारकांना भाग दाखला तसेच सदस्यत्व देते वेळी पतिसह पत्नीच्या नावाची "संयुक्त सभासद" म्हणून नोंद घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी