नोकरदारांची मजा, मार्च महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या

मुंबई: नवीन वर्ष सुरू होऊन मार्च महिना उजाडला आहे. मार्च महिना म्हटला की वेध लागतात होळी पाठोपाठ मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याचे. सण, उत्सवांसह तो नोकरदारांसाठी प्रत्येकी पाच शनिवार, रविवारसह होळी, गुढीपाडवा व रमजान ईदच्या सुट्यांची पर्वणी घेऊन आला आहे. ३१ दिवसांच्या महिन्यात नोकरदारांना १२ सुट्या उपभोगता येणार आहेत.


मार्चमध्ये जोडून सुट्या येत आहेत. त्यात १ व २ मार्चला पहिला शनिवार व रविवार आला आहे. ८ व ९ मार्चला दुसरा वीक एंड, १४ मार्चला धुलिवंदन, त्यानंतर १५ व १६ मार्च, २२ व २३ मार्चला शनिवारी व रविवारी, २९ व ३० मार्च दुसरा विक एंड, २९ व ३० मार्च रोजी शनिवार-रविवार आहे. रविवारी गुढीपाडवा आहे, तर ३१ मार्च रोजी रमजान ईदची सुटी आहे. नोकरदारांचा या महिन्यात सुट्यांमुळे आनंदी आनंद आहे, तर होळी व रमजान ईदची सुटी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे.



गुढीपाडवा आला रविवारी


मार्च महिन्यातील अनेक सुट्ट्‌यांपैकीच एक आहे मराठी नववर्ष असलेला गुढीपाडवा. गुढीपाडवा रविवारी येत असल्याने वेगळी सुट्टी राहणार नाही. त्यामुळे नोकरदारांसह विद्यार्थ्यांची देखील एक सुटी जाणार आहे.



मार्च महिन्यातील सुट्या अशा


१, ८, १५, २२ व २९ शनिवार, २, ९, १६, २३ व ३० रविवारी १४ मार्च रोजी होळी, गुढीपाडवा (३० मार्च) वलगेच दुसऱ्यादिवशी ३१ मार्च रोजी रमजान ईद आहे.



विद्यार्थी नियोजनात व्यस्त


याची सगळ्या जास्त उत्सूकता आहे ती सण, उत्सवांसह तो नोकरदारांसाठी शालेय विद्यार्थ्यांना, त्यांना त्यांचे पुढील नियोजन करत परिवारांसोबत जाण्यासाठी धडपड चालू असते.

Comments
Add Comment

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना