Bolivia bus accident : बोलिव्हियामध्ये रस्ता चुकलेल्या बसचा अपघात होऊन ३७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी


सुक्रे : बोलिव्हियामध्ये दोन बसची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.यात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३९ हून अधिक जण जखमी झाले आहेत. उयुनी आणि कोलचानी दरम्यानच्या महामार्गावर पहाटेच्या सुमारास एक बस चुकीच्या लेनमध्ये गेल्याने हा अपघात झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, उयुनी आणि कोलचानी शहरांमधील मार्गावर पहाटेच्या सुमारास एक वाहन समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसल्याने हा अपघात झाला.या प्राणघातक अपघातामुळे ३९ जण जखमी झाले आहेत आणि ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे,” असे पोटोसीच्या विभागीय पोलिस कमांडच्या प्रवक्त्याने सांगितले.



या अपघातातील जखमींवर उयुनी शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मृतांची ओळख पटवण्याचं आणि जखमींना मदत करण्याचं काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.या अपघातातील एक बस ओरुरो शहराकडे जात होती, जिथे वीकेंड ओरुरो कार्निव्हल आयोजित केला होता. घटनास्थळी, एका बसला एका क्रेनने उलटे केले, आणि पोलिस अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहनांमधून मृतदेह काढत त्यांना ब्लँकेटमध्ये गुंडाळून घेऊन जाताना दिसत होते.


बोलिव्हिया सरकारच्या मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या बस अपघाताचं प्रमुख कारण जास्त वेग असू शकतो. तसेच एक बस विरुद्ध लेनमध्ये गेली होती, ज्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल