उत्तराखंड : हिमस्खलनातील ४७ कामगारांना वाचवण्यात यश

Share

चमौली : उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमौली जिल्ह्यातील मानाजवळ शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. घटनास्थळी गेल्या ३० तासांपासून बचावकार्य सुरू आहे. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान ४ जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.

हिमस्खलनात सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) ५७ कामगार अडकले होते. त्यापैकी आतापर्यंत ४७ कामगारांना वाचण्‍यात यश आले असून, ५ जणांचा शोध सुरु आहे.

उत्तराखंडमधील चमोली येथे शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी सकाळी हिमस्खलन झाले. बद्रीनाथपासून ३ किलोमीटर अंतरावरील चमोलीच्या माना गावात ही घटना घडली. बर्फाचा ढिगारा कोसळला. हिमस्खलनात बर्फ हटवण्याच्या कामात गुंतलेले सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) कामगार अडकले.

शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ३३ जणांना वाचवण्यात यश आले. तर आज, शनिवारी सकाळी १४ जणांना बाहेर काढण्यात आले. तीन जखमी कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरद्वारे माना येथून जोशीमठ येथे गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले.

घटनास्थळी ३० तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू आहे. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान ४ जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, लष्कर, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे २०० हून अधिक सैनिक बचाव कार्यात गुंतले आहेत.

Tags: Uttarakhand

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

25 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

45 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago