उत्तराखंड : हिमस्खलनातील ४७ कामगारांना वाचवण्यात यश

चमौली : उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमौली जिल्ह्यातील मानाजवळ शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. घटनास्थळी गेल्या ३० तासांपासून बचावकार्य सुरू आहे. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान ४ जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.


हिमस्खलनात सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) ५७ कामगार अडकले होते. त्यापैकी आतापर्यंत ४७ कामगारांना वाचण्‍यात यश आले असून, ५ जणांचा शोध सुरु आहे.


उत्तराखंडमधील चमोली येथे शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी सकाळी हिमस्खलन झाले. बद्रीनाथपासून ३ किलोमीटर अंतरावरील चमोलीच्या माना गावात ही घटना घडली. बर्फाचा ढिगारा कोसळला. हिमस्खलनात बर्फ हटवण्याच्या कामात गुंतलेले सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) कामगार अडकले.



शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ३३ जणांना वाचवण्यात यश आले. तर आज, शनिवारी सकाळी १४ जणांना बाहेर काढण्यात आले. तीन जखमी कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरद्वारे माना येथून जोशीमठ येथे गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले.


घटनास्थळी ३० तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू आहे. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान ४ जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, लष्कर, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे २०० हून अधिक सैनिक बचाव कार्यात गुंतले आहेत.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून