प्रहार    

Nashik News : शेअर मार्केटमध्ये नुकसान, युवकाने घेतले स्वतःला जाळून

  102

Nashik News : शेअर मार्केटमध्ये नुकसान, युवकाने घेतले स्वतःला जाळून

नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे एका युवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती उलाढाल सुरू आहे शेअर बाजार हा दिवसेंदिवस खाली उतरत आहे त्यामुळे नाशिक शहरात राहत असलेला आणि मूळचा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहत असलेला राजेंद्र शिवाजी कोल्हे या ३० वर्षीय युवकाने शेअर बाजारामध्ये सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.



नाशिकमध्ये नोकरी करून आई-वडिलांना पैसे न देता ते शेअर बाजारामध्ये अडकविले वेळप्रसंगी आपल्या मित्र मंडळा कडून पैसे घेऊन ते शेअर बाजारामध्ये अडकविले परंतु शेअर बाजारामध्ये दिवसेंदिवस नुकसान होत गेल्याने हा युवक हतबल झाला होता अखेर या युवकाने महाशिवरात्रीच्या दिवशी त्रंबकेश्वर येथे जाऊन त्रंबकेश्वर चे दर्शन घेतले आणि येताना पिंपळगाव बहुला या ठिकाणी असलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये आपली दुचाकी घेऊन जाऊन ती सर्वप्रथम पेटवली आणि अंगावरती पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतले पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये राजेंद्र कोल्हे याला दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्याचे शनिवारी निधन झाले. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

मुलांची उंची वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी त्यांना द्या हा पौष्टिक आहार

मुंबई: मुलांची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी त्यांना पौष्टिक आहार देणे खूप महत्त्वाचे असते. चांगल्या उंचीसाठी

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत

लाँग वीकेंडमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग गर्दी टाळण्यासाठी ही ठिकाणे टाळा!

मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीमुळे यंदा ऑगस्ट महिन्यात एक मोठा लाँग वीकेंड येत आहे.