Nashik News : शेअर मार्केटमध्ये नुकसान, युवकाने घेतले स्वतःला जाळून

नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे एका युवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती उलाढाल सुरू आहे शेअर बाजार हा दिवसेंदिवस खाली उतरत आहे त्यामुळे नाशिक शहरात राहत असलेला आणि मूळचा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहत असलेला राजेंद्र शिवाजी कोल्हे या ३० वर्षीय युवकाने शेअर बाजारामध्ये सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.



नाशिकमध्ये नोकरी करून आई-वडिलांना पैसे न देता ते शेअर बाजारामध्ये अडकविले वेळप्रसंगी आपल्या मित्र मंडळा कडून पैसे घेऊन ते शेअर बाजारामध्ये अडकविले परंतु शेअर बाजारामध्ये दिवसेंदिवस नुकसान होत गेल्याने हा युवक हतबल झाला होता अखेर या युवकाने महाशिवरात्रीच्या दिवशी त्रंबकेश्वर येथे जाऊन त्रंबकेश्वर चे दर्शन घेतले आणि येताना पिंपळगाव बहुला या ठिकाणी असलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये आपली दुचाकी घेऊन जाऊन ती सर्वप्रथम पेटवली आणि अंगावरती पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतले पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये राजेंद्र कोल्हे याला दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्याचे शनिवारी निधन झाले. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

हिवाळ्यातील सुपरफूड! तीळ खाल्ल्याने हृदय, हाडे आणि त्वचेला मिळतात फायदे. जाणून घ्या जबरदस्त फायदे

तीळ खाण्याचे फायदे जाणून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट 'आशा'ची विशेष स्क्रीनिंग! आशा सेविकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई: जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष

'मनाचे श्लोक' चित्रपटाबाबत मृण्मयीचा मोठा निर्णय! 'या' तारखेला पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी राज्यभर

संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण

देशातील मतदार यादींचे गहन पुनरावलोकन (एसआयआर) लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक

आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर

टेक कंपनी गुगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील

तुंबाडची ७ वर्षे, सोहम शाह यांनी चित्रपटामागील स्वप्न उलगडले!

मुंबई : जेव्हा तुंबाड (२०१८) प्रदर्शित झाला तेव्हा त्याने सर्व चित्रपट शैलींच्या सीमा तोडून स्वतःसाठी एक वेगळे