WhatsApp Governance : महाराष्ट्रात आता 'व्हॉट्सअ‍ॅप गव्हर्नन्स'

व्हॉट्सअ‍ॅप सेवेच्या माध्यमातून 'आपले सरकार'च्या ५०० सेवा मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई : महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने “आपले सरकार” पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp Governance) उपलब्ध होणार आहेत. राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाइन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाइन प्रक्रियांपासून दूर राहायचे. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहता, आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअ‍ॅपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात “व्हॉट्सअ‍ॅप गव्हर्नन्स” चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आपले सरकार व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यात बीकेसी येथे सामंजस्य करार (WhatsApp Governance) झाला. त्याचबरोबर एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एम.एम.आर.डी.ए. ने एन.पी.सी.आय. ला मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.


बीकेसी येथे मुंबई टेक वीक २०२५ चा शुभारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जियो कन्वेंशन सेंटर येथे मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.


मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वॉररूममुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला वेग मिळला आहे. पूर्वी मुंबईत एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी १८ विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यावी लागायची, त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. वॉररूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणून त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामुळे मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यासारख्या प्रकल्पांना गती मिळाली, असे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai News: सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल; रिलस्टार रणदीप गुजराल अटकेत

मुंबई : मुलुंड (Mulund) परिसरातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या रणदीप हरबिंदरसिंग गुजराल (वय 40) या

Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या

Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) शाळा ही केवळ शिक्षण

DCM Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबईत शुन्य जीवितहानी उद्दीत ठेवा मुंबई महापालिकेसह सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे दिले

Goregaon Motilal Nagar Redevelopment Project : गोरेगाव मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पात २२० झाडे बाधित

- पालघरमधील चहाडे गावात लावणार ४००६ झाडे लावणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगरमधील