DCM Eknath Shinde : ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची अंमलबजावणी करावी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.



सह्याद्री अतिथीगृह येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान संचालक ई. रविंद्रन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त विजय पाखमोडे आदी यावेळी उपस्थित होते. राज्यात जलजीवन निशन अंतर्गत २० हजार घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्यामाध्यमातून सुमारे ८० लाख कुटुंबांना फायदा होत आहे. उर्वरित घरांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश दिल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले मराठवाड्याचा दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.


यावेळी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी.आर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाबाबत चर्चा केल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे नमूद केले.

Comments
Add Comment

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा खोळंबा

मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह