अमृताहुनी गोड नाम तुझे देवा...

  110

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


आज इतकी वर्षे होऊन गेली तरीसुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास यांच्यासारख्या थोर संतांचे नाव टिकून राहिले आहे. याचे खरे कारण हे की, त्यांचे नामावर अत्यंत प्रेम होते. या सर्व संतांच्या वचनांवर आपण विश्वास ठेवतो. त्यांच्याप्रमाणे नामाचे प्रेम आपल्यालाही यावे असे आपल्याला वाटते. पण ते प्रेम आम्हाला का उत्पन्न होत नाही, याचा विचार आपण करायला पाहिजे. त्या नामाला उपमा देताना, ते अमृतापेक्षाही गोड आहे असे त्यांनी सांगितले. नामाला अमृताची उपमा देताना, त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असे आपण म्हणतो. मग त्या नामाचे प्रेम आम्हाला का बरे नसावे? तर त्या नामाच्या आड काही तरी येत असले पाहिजे हे खास. ज्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावर आम्हाला जर ती गोड लागली नाही, तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल, तर आमच्यामध्येच काही तरी दोष असला पाहिजे खास.


नामाचे प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काही अडचणी सांगतात. कुणाला विचारले, “ नामाचे प्रेम का येत नाही ?” तर तो सांगतो, “ माझे लग्न झाले नाही. ते होऊन प्रपंच, मुलेबाळे हे सर्व झाल्यावर मला नामाचे प्रेम येईल.” पण लग्न करून मुलेबाळे असलेल्या किती लोकांना नामाचे प्रेम लागले आहे? कोणी म्हणतो, “ पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचे प्रेम येत नाही.” परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या किती लक्षाधीशांनी नामाचे प्रेम मिळविले आहे? कोणी म्हणतो, “ या प्रपंचात बायकोमुले, आजारपण, शेतीवाडी यांच्या व्यापामुळे आम्हांला नामाचे प्रेम लागत नाही;” तर कोणी म्हणतो, “ प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे; मी आता संन्यास घेतो, म्हणजे मला नामाचे प्रेम येईल;” तर कोणी प्रापंचिक दु:खाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो. अशा रीतीने, सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात. नामाचे प्रेम न यायला खरोखरच परिस्थिती कारणीभूत आहे का, याचा विचार आपण करायला पाहिजे. मला वाटते, नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल, तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही. भगवंत हवा आहे असे वाटणे, हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे. तुम्हाला खरोखरच भगवंत हवा आहे असे वाटू लागले म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल.


तात्पर्य : नामाची गोडी अशी विलक्षण आहे की, ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहात नाही. म्हणून नामाला वाहून घ्यावे.

Comments
Add Comment

Vastu Tips : तुमच्या घरातही या पाच चुका होतात का? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला, नाहीतर घरात येईल दरिद्रता!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप

Success Tips: पैसा टिकवून ठेवायचा आहे? 'या' ५ चांगल्या सवयी तुम्हाला बनवतील श्रीमंत!

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्य नीती'मध्ये केवळ राजकारण आणि समाजकारणच नव्हे, तर पैसा कमावण्याचे आणि

सोनपावलांनी घरा, गौराई येई माहेरा !

मनाचा गाभारा - अर्चना सरोदे आज माझ्या उंबरठ्यात उभी गौर सवाशीण चला लिंबलोण करू, आली माहेरवाशीण ओलांडूनी उंबरठा

गणेशोत्सव श्रद्धा ते सजगता

ऋतुराज - ऋतुजा केळकर गणपती बाप्पा म्हणजे केवळ एक देव नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो सकाळच्या मंद

महर्षी विश्वामित्र

भारतीय ऋषी - डॉ. अनुराधा कुलकर्णी ॐ भूर्भुवःसः । तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात्

शुद्ध भाव

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै देवावर प्रेम करायला शिकले पाहिजे. देवावर प्रेम तेव्हाच करता येईल जेव्हा जेव्हा