Mumbai News : नाट्यरसिकांची होणार गैरसोय! उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर बंद

मुंबई : मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी सुगीचा काळ असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पश्चिम उपनगरांतील प्रेक्षकांना नाट्यदुर्भीक्षाला तोंड द्यावे लागणार आहे. परिसरातील एकमेव मोठे नाट्यगृह बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर (Prabodhankar Keshav Sitaram Thackeray Natya Mandir) डागडुजीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषतः कांदिवली आणि बोरिवली परिसरात इतर नाट्यगृह नसल्यामुळे येथील रसिकप्रेक्षकांना दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहरातील नाट्यगृहात यावे लागणार आहे. मात्र ऐन उन्हाळाच्या सुट्टीत मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून मुंबई उपनगरातील रसिकप्रेक्षकांची गैरसोय होणार आहे.



ऐन सुट्टीच्या हंगामातच प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिराच्या मुख्य नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षक व निर्मात्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी लघु नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले असून सुट्टीच्या काळातही लघु नाट्यगृह व तालीम दालने सुरु राहणार आहेत. डागडुजीच्या कामाअंतर्गत मुख्य नाट्यगृहातील छत गळतीमुक्त करणे, नवीन बैठकव्यवस्था, फरशा बदलणे, रंगमंचाला नवा साज, कलाकार व तंत्रज्ञांच्या कक्षाची दुरुस्ती, रंगकाम, प्रकाशयोजना, विद्युत यंत्रणेत बदल यांसह नाट्यगृहाच्या परिसराची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पश्चिम उपनगरातील प्रेक्षकांना, नाट्यरसिकांना विलेपार्ले येथील मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह गाठावे लागणार आहे किंवा जवळपास दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहर आणि पूर्व उपनगरांतील नाट्यगृहांतील प्रयोग पहावे लागणार आहेत.


उन्हाळी सुट्टीच्या काळात म्हणजेच एप्रिल ते मे महिन्यांत नाट्यप्रयोगांना उत्तम प्रतिसाद असतो. मात्र पावसाळ्यात नाट्यगृहाच्या छताचे काम करता येणार नाही, त्यामुळे डागडुजीचे काम उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे’, असे ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले.

Comments
Add Comment

US-India Trade Deal: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराचे कौतुक

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

पद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून तीन महापालिकांत महिलांना संधी मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण

रस्त्यावर थुंकल्यास, कचरा टाकल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ

महापालिकेने नव्याने स्वच्छता उपविधी तयार दंडाची रक्कमेची आकारणी २ फेब्रुवारीपासून अमलात मुंबई : मुंबई

मेट्रो- ४ मार्गिकेच्या कामाला गती

भांडुप येथे ३२५ मेट्रिक टनचे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या स्थापित मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून

महाराष्ट्रासाठी रेल्वेची २३ हजार कोटी रुपयांची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत सोमवारी माहिती देताना