Mumbai News : नाट्यरसिकांची होणार गैरसोय! उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर बंद

मुंबई : मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी सुगीचा काळ असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पश्चिम उपनगरांतील प्रेक्षकांना नाट्यदुर्भीक्षाला तोंड द्यावे लागणार आहे. परिसरातील एकमेव मोठे नाट्यगृह बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर (Prabodhankar Keshav Sitaram Thackeray Natya Mandir) डागडुजीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषतः कांदिवली आणि बोरिवली परिसरात इतर नाट्यगृह नसल्यामुळे येथील रसिकप्रेक्षकांना दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहरातील नाट्यगृहात यावे लागणार आहे. मात्र ऐन उन्हाळाच्या सुट्टीत मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून मुंबई उपनगरातील रसिकप्रेक्षकांची गैरसोय होणार आहे.



ऐन सुट्टीच्या हंगामातच प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिराच्या मुख्य नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षक व निर्मात्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी लघु नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले असून सुट्टीच्या काळातही लघु नाट्यगृह व तालीम दालने सुरु राहणार आहेत. डागडुजीच्या कामाअंतर्गत मुख्य नाट्यगृहातील छत गळतीमुक्त करणे, नवीन बैठकव्यवस्था, फरशा बदलणे, रंगमंचाला नवा साज, कलाकार व तंत्रज्ञांच्या कक्षाची दुरुस्ती, रंगकाम, प्रकाशयोजना, विद्युत यंत्रणेत बदल यांसह नाट्यगृहाच्या परिसराची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पश्चिम उपनगरातील प्रेक्षकांना, नाट्यरसिकांना विलेपार्ले येथील मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह गाठावे लागणार आहे किंवा जवळपास दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहर आणि पूर्व उपनगरांतील नाट्यगृहांतील प्रयोग पहावे लागणार आहेत.


उन्हाळी सुट्टीच्या काळात म्हणजेच एप्रिल ते मे महिन्यांत नाट्यप्रयोगांना उत्तम प्रतिसाद असतो. मात्र पावसाळ्यात नाट्यगृहाच्या छताचे काम करता येणार नाही, त्यामुळे डागडुजीचे काम उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे’, असे ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या करारांतर्गत ९ जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

जागतिक मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर - कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उदघाटन मुंबई : जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा

US-India Trade Deal: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराचे कौतुक

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

पद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून तीन महापालिकांत महिलांना संधी मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण