Virat Kohli: तब्बल १५ महिन्यांनी विराटचे शतक, पाकच्या गोलंदाजांना धुतले

  73

दुबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याने तब्बल १५ महिन्यांनी वनडे क्रिकेटमध्ये आपले शतक ठोकले. त्याने ही कामगिरी रविवारी केली. कोहलीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १११ बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले.

वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीचे हे ५१वे शतक आहे. असे करणारा तो जगातील पहिला क्रिकेटर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

खरंतर, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गंत रविवारी भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्यात पाकिस्तानने २४२ धावांचे आव्हान दिले होते. याच्या प्रत्युत्तराला भारतीय संघाने हा सामना ६ विकेट राखत जिंकला.

कोहलीचे १५ महिन्यांनी शतक


सामन्यात कोहलीची बॅट चांगलीच तळपली. त्याने १११ बॉलमध्ये शतक ठोकले. या दरम्यान त्याने ७ चौकार ठोकले. कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल १५ महिन्यांनी शतक ठोकले. याआधी त्याने १५ नोव्हेंबर २०२३मध्ये शतकी खेळी केली होती. तेव्हा कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ११७ धावा केल्या होत्या.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी