Dombivali News : ६,५०० डोंबिवलीकरांची फसवणूक; रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष!

डोंबिवली : उच्च न्यायालयाने (High Court) केडीएमसीला ६५ इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश पारित केल्याने सदर इमारतीत घरे खरेदी केलेल्या नागरिकांनसमोर मोठा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे. घरासाठी सोनेनाणे विकून, बँकांकडून कर्ज घेऊन स्वतः चे घर व्हावे म्हणून सदर इमारती मध्ये गुंतवणूक केली. परंतु आता यांना न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Dombivali News)



या बेकायदा इमारती प्रकरणात महापालिकेपासून रेरापर्यत सगळ्यांची फसवणूक केली आहे. या इमारतींना रेराकडून परवानगी पत्र देण्यात आले होते. त्या आधारावर बँकांकडून कोणतीही शहानिशा न करता ग्राहकांना कर्ज दिले. धक्कादायक घटना म्हणजे बँकांकडून चौकशीला बगल देत कर्ज दिले. तसेच बँकांच्या मदतीशिवाय इमारती उभ्या राहत नाही. परंतु आता बँकांनाही आरोपी करण्यात यावे.


खातेदारासंदर्भात कोणी घोटाळा केला तर आरबीआयच्या (RBI) वेबसाईटवर ४८ तासात लोड करणे आवश्यक असते. तरी ज्या बँकांकडून विना शहानिशा न करता ग्राहकांना कर्ज दिले आहे त्याची आरबीआयने खात्यामार्फत चौकशी करणे गरजेचे आहे.या बेकायदा इमारती प्रकरणात सगळ्या संस्थाचे अपयश आहे. रेरानेही सदर प्रकरणाता गुन्हा दाखल करावा कारण त्यांचीही फसवणूक झाली आहे.रेराच्या कागदपत्रे या आधारावर बँकांकडून कर्ज दिली गेल्याचे दिसून येते आहे. आता या निष्पाप नागरिकांना सर्वोच्च न्यायालयालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत. अनधिकृत बांधकामाना चालना मिळणार असेल तर, न्यायालय सहानुभूती पूर्वक निर्णय घेईल असे वाटत नाही. या विविध खाते यंत्रणाचा निष्काळजीपणा दिसत आहे. सरकारने सर्व आरोपींची मालमत्ता, नव्या स्कीम मधील घरविक्री गोठवली पाहिजे. तसेच न्यायालयान बांधकाम नियमित करण्यासाठी कल दिसून येत नाही. तसेच ग्राहकांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गतही लाभ घेतला आहे. त्यामुळे आता शासनाचीही फसवणूक झाली आहे. ज्या-ज्या संस्थाने या बेकायदा इमारत संबंधित मदत करून ग्राहकांना फसवले त्यांच्यावर विनाविलंब गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजेत. सदर प्रकरणात राजकीय नेत्यांनी पाठबळ दिल्याशिवाय व सहकार्य केले असल्याशिवाय एवढा मोठा इमारती घोटाळा होणे शक्य नाही. (Dombivali News)

Comments
Add Comment

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त

मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर; महापालिका राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर

अजित पवारांच्या खासगी सचिवाची कसून चौकशी

मुंबई : अजित पवारांचे बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान अपघातात निधन झाले. या प्रकरणी राज्याच्या गुन्हे