कळवा पुलावर अखेर बसवली सुरक्षा साधने

२०२२ मध्ये लाेकार्पण झालेल्या या पुलावर संरक्षण कुंपण झाले तयार


ठाणे  : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कळवा पुलावर अखेर सुरक्षा साधने बसविण्यात आले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून येथील पुलावर सुरक्षा साधनांचे कुंपण नसल्याने पादचारी आणि वाहनांचे अपघात होऊन जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही सुरक्षा साधने गर्दुल्ल्यांनी चोरी केल्याचा संशय महापालिकेला होता. त्यामुळे आता येथे लोखंडी सुरक्षा साधने बसविण्यात आली आहेत. ठाणे शहरातून नवी मुंबई, मुंब्रा,कळवा, विटावा भागात वाहतुक करण्यासाठी कळवा खाडी पुलाची मार्गिका महत्त्वाची आहे. या मार्गावरून हजारो हलकी वाहने वाहतुक करतात. जुना कळवा पूल हा वाहतुकीसाठी अरुंद होता. त्यामुळे ठाणे महापालिकेने हा तिसरा नवा खाडी पूल बांधला होता. त्यासाठी महापालिकेने १८३ कोटी रुपये खर्च केले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये या पुलाचे लोकार्पण झाले होते.



पुल उभारताना ठाणे महापालिकेने त्याचे सुशोभिकरण केले होते. तसेच उड्डाणपुलालगत एक पदपथ बनविण्यात आले होते. उड्डाणपुलाखालून ठाणे खाडी वाहते. त्यामुळे महाालिकेने सुरक्षेच्या दृष्टिने या पदपथालगत काच सदृष्य साधने बसवून सुरक्षा कुंपण तयार केले होते. तसेच उड्डाणपुलावर विद्युत रोषणाई देखील केली होती. विद्युत रोषणाई आणि इतका मोठा खाडी पूल ठाण्यात पहिल्यांदाच बनविल्याने पुलावर फेरफटका मारण्यासाठी आणि स्वयंचित्र, छायाचित्र काढण्यासाठी नागरिक दररोज पुलालगतच्या पदपथावर येऊ लागले होते. खरं तर सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग अितशय महत्त्वाचा होता. याकडे मात्र दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नागरिक त्रासले होते मागील काही महिन्यांपासून येथील सुरक्षा साधनांचे कुंपण चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. अपुऱ्या सुरक्षा साधनांमुळे फेरफटका मारण्यासाठी आलेले नागरिक खाडीत पडण्याची भिती व्यक्त केली जात होती. अखेर ठाणे महापालिकेने येथे नव्याने लोखंडी संरक्षण कुंपण बसविले आहे. पूर्वी प्रमाणे काच सदृश्य साधनांचा वापर यावेळी टाळण्यात आला आहे. सुरक्षा कुंपणांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या