कळवा पुलावर अखेर बसवली सुरक्षा साधने

  50

२०२२ मध्ये लाेकार्पण झालेल्या या पुलावर संरक्षण कुंपण झाले तयार


ठाणे  : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कळवा पुलावर अखेर सुरक्षा साधने बसविण्यात आले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून येथील पुलावर सुरक्षा साधनांचे कुंपण नसल्याने पादचारी आणि वाहनांचे अपघात होऊन जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही सुरक्षा साधने गर्दुल्ल्यांनी चोरी केल्याचा संशय महापालिकेला होता. त्यामुळे आता येथे लोखंडी सुरक्षा साधने बसविण्यात आली आहेत. ठाणे शहरातून नवी मुंबई, मुंब्रा,कळवा, विटावा भागात वाहतुक करण्यासाठी कळवा खाडी पुलाची मार्गिका महत्त्वाची आहे. या मार्गावरून हजारो हलकी वाहने वाहतुक करतात. जुना कळवा पूल हा वाहतुकीसाठी अरुंद होता. त्यामुळे ठाणे महापालिकेने हा तिसरा नवा खाडी पूल बांधला होता. त्यासाठी महापालिकेने १८३ कोटी रुपये खर्च केले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये या पुलाचे लोकार्पण झाले होते.



पुल उभारताना ठाणे महापालिकेने त्याचे सुशोभिकरण केले होते. तसेच उड्डाणपुलालगत एक पदपथ बनविण्यात आले होते. उड्डाणपुलाखालून ठाणे खाडी वाहते. त्यामुळे महाालिकेने सुरक्षेच्या दृष्टिने या पदपथालगत काच सदृष्य साधने बसवून सुरक्षा कुंपण तयार केले होते. तसेच उड्डाणपुलावर विद्युत रोषणाई देखील केली होती. विद्युत रोषणाई आणि इतका मोठा खाडी पूल ठाण्यात पहिल्यांदाच बनविल्याने पुलावर फेरफटका मारण्यासाठी आणि स्वयंचित्र, छायाचित्र काढण्यासाठी नागरिक दररोज पुलालगतच्या पदपथावर येऊ लागले होते. खरं तर सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग अितशय महत्त्वाचा होता. याकडे मात्र दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नागरिक त्रासले होते मागील काही महिन्यांपासून येथील सुरक्षा साधनांचे कुंपण चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. अपुऱ्या सुरक्षा साधनांमुळे फेरफटका मारण्यासाठी आलेले नागरिक खाडीत पडण्याची भिती व्यक्त केली जात होती. अखेर ठाणे महापालिकेने येथे नव्याने लोखंडी संरक्षण कुंपण बसविले आहे. पूर्वी प्रमाणे काच सदृश्य साधनांचा वापर यावेळी टाळण्यात आला आहे. सुरक्षा कुंपणांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं