Thane News : ठाणे शहरात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने आग लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा या शहरांचा समावेश होतो. या क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे. यात आठ अग्निशमन केंद्रे असून ९८ अग्निशामक वाहने आहेत. असे असले तरी शहरात विविध कारणांमुळे आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रात १४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार महिन्यातील दिवसांपेक्षा आगीच्या घटना सर्वाधिक घडत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ७३ तर फेब्रुवारी मध्ये ८० आगीच्या घटना घडल्या होत्या.



मागील वर्षीच्या तुलनेत २०२५ या नवीन वर्षात आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, तांत्रिक कारणे, गॅस गळती आणि ज्वलनशील पदार्थांच्या चुकीच्या हाताळणीमुळे आगीची प्रकरणे समोर आली आहेत. ठाणे शहरात मागील काही वर्षांपासून मोठमोठी गृहसंकुले, हॉटेल, बिझनेस हब यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वीजेचा वापर देखील वाढला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण्याचे तापमान हे वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेचा वापरही अधिक प्रमाणात होऊ लागल्याने उपकरणांमधील बिघाडांमुळे या आगी लागत आहेत. तर शहरातील मुंब्रा, वागळे या दोन्ही परिसरात एच पी गॅस सिलिंडर गळती झाल्याने आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

GST benefits on Classic Legend Java Yezd Bike: जावा, येझदी मोटारसायककडून जीएसटी दर कपात फायदा ग्राहकांकडे पास

क्लासिक लेजेंड्स कंपनीने देशभरातील ४५० हून अधिक केंद्रांवर विक्री आणि सेवांचा केला विस्तार प्रतिनिधी:जवळजवळ

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई : अमेरिकेची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने २०२५ मध्ये भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप