Thane News : ठाणे शहरात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने आग लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा या शहरांचा समावेश होतो. या क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे. यात आठ अग्निशमन केंद्रे असून ९८ अग्निशामक वाहने आहेत. असे असले तरी शहरात विविध कारणांमुळे आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रात १४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार महिन्यातील दिवसांपेक्षा आगीच्या घटना सर्वाधिक घडत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ७३ तर फेब्रुवारी मध्ये ८० आगीच्या घटना घडल्या होत्या.



मागील वर्षीच्या तुलनेत २०२५ या नवीन वर्षात आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, तांत्रिक कारणे, गॅस गळती आणि ज्वलनशील पदार्थांच्या चुकीच्या हाताळणीमुळे आगीची प्रकरणे समोर आली आहेत. ठाणे शहरात मागील काही वर्षांपासून मोठमोठी गृहसंकुले, हॉटेल, बिझनेस हब यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वीजेचा वापर देखील वाढला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण्याचे तापमान हे वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेचा वापरही अधिक प्रमाणात होऊ लागल्याने उपकरणांमधील बिघाडांमुळे या आगी लागत आहेत. तर शहरातील मुंब्रा, वागळे या दोन्ही परिसरात एच पी गॅस सिलिंडर गळती झाल्याने आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Jalna Congress : काँग्रेस पक्षाकडून जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन

जालना : जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

Bigg Boss Marathi 6 : विशालनं वैयक्तिक मर्यादा ओलांडल्या, राकेशच्या कुटुंबियांनी रितेश देशमुखकडे केली मोठी मागणी

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात आणखीन एका

Aditya Dhar : धुरंधर २ अडचणीत येणार ? प्रसिद्ध फिल्ममेकरचे दिग्दर्शक आदित्य धरवर गंभीर आरोप, कारवाईचाही इशारा

मुंबई : धुरंधर २ सिनेमा जगभरात धूमाकूळ घालत आहे. या सिनेमानं कमाईच्या बाबतीतही सगळे रेकॉर्डब्रेक केले आहेत.

Canada : कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या

कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७