Thane News : ठाणे शहरात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने आग लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा या शहरांचा समावेश होतो. या क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे. यात आठ अग्निशमन केंद्रे असून ९८ अग्निशामक वाहने आहेत. असे असले तरी शहरात विविध कारणांमुळे आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रात १४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार महिन्यातील दिवसांपेक्षा आगीच्या घटना सर्वाधिक घडत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ७३ तर फेब्रुवारी मध्ये ८० आगीच्या घटना घडल्या होत्या.



मागील वर्षीच्या तुलनेत २०२५ या नवीन वर्षात आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, तांत्रिक कारणे, गॅस गळती आणि ज्वलनशील पदार्थांच्या चुकीच्या हाताळणीमुळे आगीची प्रकरणे समोर आली आहेत. ठाणे शहरात मागील काही वर्षांपासून मोठमोठी गृहसंकुले, हॉटेल, बिझनेस हब यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वीजेचा वापर देखील वाढला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण्याचे तापमान हे वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेचा वापरही अधिक प्रमाणात होऊ लागल्याने उपकरणांमधील बिघाडांमुळे या आगी लागत आहेत. तर शहरातील मुंब्रा, वागळे या दोन्ही परिसरात एच पी गॅस सिलिंडर गळती झाल्याने आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

प्रकाश महाजन भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

नागपूर : मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतासाठी २०२५ वर्ष सर्वात उष्ण ठरणार?

नवी दिल्ली : जगभरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.

राज्यात भीक मागणे हा गंभीर गुन्हा होणार

नागपूर : महाराष्ट्रात भीक मागण्यावर प्रतिबंध घालणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.

बिबट्यांना पकडण्यासाठी ३० गावांत ५१ पिंजरे

निरगुडसर  : बिबट्यांना पकडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर वनक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५