Thane News : ठाणे शहरात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने आग लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा या शहरांचा समावेश होतो. या क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे. यात आठ अग्निशमन केंद्रे असून ९८ अग्निशामक वाहने आहेत. असे असले तरी शहरात विविध कारणांमुळे आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रात १४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार महिन्यातील दिवसांपेक्षा आगीच्या घटना सर्वाधिक घडत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ७३ तर फेब्रुवारी मध्ये ८० आगीच्या घटना घडल्या होत्या.



मागील वर्षीच्या तुलनेत २०२५ या नवीन वर्षात आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, तांत्रिक कारणे, गॅस गळती आणि ज्वलनशील पदार्थांच्या चुकीच्या हाताळणीमुळे आगीची प्रकरणे समोर आली आहेत. ठाणे शहरात मागील काही वर्षांपासून मोठमोठी गृहसंकुले, हॉटेल, बिझनेस हब यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वीजेचा वापर देखील वाढला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण्याचे तापमान हे वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेचा वापरही अधिक प्रमाणात होऊ लागल्याने उपकरणांमधील बिघाडांमुळे या आगी लागत आहेत. तर शहरातील मुंब्रा, वागळे या दोन्ही परिसरात एच पी गॅस सिलिंडर गळती झाल्याने आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

सुरतहून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला! तिघांचा मृत्यू तर चारजण जखमी

नाशिक: सुरतहून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शना घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला केला. काल मध्यरात्री

कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार नव्या मालिकेची मेजवानी! सुचित्रा बांदेकर, विनायक माळी घेऊन येत आहेत ‘मच्छीका पानी’

मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी मराठीतील दैनंदिन मालिका महत्त्वाची भूमिका निभावतात.

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई : यावर्षी दिवाळी

सरकारी रुग्णालयात आता रोज वेगळ्या रंगांच्या चादरी

सुरक्षित उपचार, स्वच्छतेचा नवा आराखडा तयार मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या