Mumbai Breaking News : मुंबईकरांची लाईफलाईन ठप्प!

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन आज सकाळपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा-खडवली या दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेकडून मालगाडीचे कपलिंग दुरूस्तीचे काम तातडीने करण्यात येत आहे. डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. पण प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला जास्तवेळा थांबवण्याची शक्यता आहे. दरम्यान दुरुस्तीचं काम सुरु असून लवकरच गाड्या पुर्ववत होण्याची माहिती मिळाली आहे.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर