Mumbai Breaking News : मुंबईकरांची लाईफलाईन ठप्प!

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन आज सकाळपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा-खडवली या दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेकडून मालगाडीचे कपलिंग दुरूस्तीचे काम तातडीने करण्यात येत आहे. डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. पण प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला जास्तवेळा थांबवण्याची शक्यता आहे. दरम्यान दुरुस्तीचं काम सुरु असून लवकरच गाड्या पुर्ववत होण्याची माहिती मिळाली आहे.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील