महापालिका शाळांमधील मुलांच्या शिक्षणात अदानी आणि उत्थान ग्रुपचा हातभार

मुंबई (खास प्रतिनिधी) : शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षेतून पुढील अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त करावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंदा 'गुणवत्ता वृद्धी उपक्रम' हाती घेतला आहे. सन २०२५-२६ मध्ये होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) यामध्ये प्रविष्ठ होणाऱ्या व आता इयत्ता ४ थी आणि इयत्ता ७ वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.


तसेच एप्रिल २०२५ पासूनच विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सुरू व्हावा यासाठी अदानी इलेक्ट्रिसीटी, अदानी फाउंडेशन आणि उत्थान गृप यांच्या सामाजिक उत्तर दायित्व निधीतून (सीएसआर फंड) नवनीत प्रकाशनाचे मराठी, सेमी मराठी, उर्दू व इंग्रजी माध्ममाच्या मार्गदर्शक पुस्तकांचे एकूण ५ हजार ५४१ संच वितरित करण्यात आले आहेत.



या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्यांपैकी काही निवडक विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते आज (दिनांक १७फेब्रुवारी २०२५) पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी (प्र.) (लोक सहभाग कक्ष) मुख्तार शहा यांच्यासह अदानी इलेक्ट्रिसीटीचे संजीव मुरुडकर, कैलाश शिंदे, सुबोध सिंग, पूजा अगरवाल आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.



अतिरिक्त आयुक्तांच्या विद्यार्थ्यांशी शैक्षणिक गप्पा


शिष्यवृत्ती परीक्षा शालेय जीवनातील अत्यंत महत्वाची व आघाडीची स्पर्धा परीक्षा असते. उच्च शिक्षण घेतानाही या परीक्षेचा खूप फायदा होतो. विद्यार्थ्यांना लहान वयापासून आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केले. तसेच पुस्तक स्वीकारण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी त्यानी मनमोकळ्या गप्पाही केल्या. काही विद्यार्थ्यांना त्यांनी मराठी आणि इंग्रजी वाचायलाही लावले.



यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार


उपआयुक्त डॉ. जांभेकर यांनी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या "गुणवत्ता वृद्धी उपक्रमाची माहिती दिली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. सन२०२४ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे इयत्ता ५ व ८ वीचे अनुक्रमे ३,५२५ व ३.३६५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यातील ३१७ (इयता ५ वी) व २७८ (इयत्ता ८ वी) अशा एकूण ६०५ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले.आहे. सन-२०२५ मध्ये इयता ५ व ८ वीतून अनुक्रमे ४,१५३ व ३,६९० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले आहेत, अशी माहिती डॉ. जांभेकर यांनी दिली, यंदा गुणवत्ता वृद्धी उपक्रमामुळे यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ