मुंबई : महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायद्यांच्या धर्तीवर एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली विकसित करावी, असे त्यांनी सुचवले. तसेच, ७ वर्षांपेक्षा अधिक ...
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास नेरूळमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या रुळावरच थांबल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. परिणामी प्रवाशांची रुळावरूनच पायपीट सुरु झाली आहे. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी पोहचले असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र या समस्येमुळे नेरुळ स्थानकावर गर्दी पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला याचा फटका बसणार आहे.