मेट्रोच्या बीकेसी - कुलाबा मार्गाचे ९३ टक्के काम पूर्ण

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पातील बीकेसी - कुलाबा टप्प्याचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ अखेर प्रवाशांसाठी हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी मेट्रोच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगाने सुरू आहे. यामुळे बीकेसी - कुलाबा टप्प्यातील मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.



'फेज 2ए' च्या बांधकामासोबतच त्याचं स्ट्रक्चर आणि सिस्टमॅटिक फंक्शन शेवटच्या टप्प्यात आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत आणण्यासाठी आवश्यक अंतिम मंजुरी दिली जाईल. बीकेसी - कुलाबा मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली तर मुंबईतील बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.



मुंबई मेट्रो अॅक्वालाईनची एकूण लांबी ३३.५ किमी आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानकं आहेत.हा मार्ग कफ परेडला बीकेसीशी तर आरेला जेव्हीएलआरशी जोडतो. याआधी पंतप्रधान मोदींनी याच मार्गावरील १२.६९ किमी लांबीच्या फेज १ चे उद्घाटन केले आहे. हे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबर २०२४ मध्ये केले होते. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो गेल्याने बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रोची कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. भूमिगत मेट्रोचे तिकीट एलिवेटेड मेट्रोच्या तुलनेत जास्त आहे. याच कारणामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो भाड्याच्या दरात पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.
Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या