मेट्रोच्या बीकेसी - कुलाबा मार्गाचे ९३ टक्के काम पूर्ण

  110

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पातील बीकेसी - कुलाबा टप्प्याचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ अखेर प्रवाशांसाठी हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी मेट्रोच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगाने सुरू आहे. यामुळे बीकेसी - कुलाबा टप्प्यातील मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.



'फेज 2ए' च्या बांधकामासोबतच त्याचं स्ट्रक्चर आणि सिस्टमॅटिक फंक्शन शेवटच्या टप्प्यात आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत आणण्यासाठी आवश्यक अंतिम मंजुरी दिली जाईल. बीकेसी - कुलाबा मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली तर मुंबईतील बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.



मुंबई मेट्रो अॅक्वालाईनची एकूण लांबी ३३.५ किमी आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानकं आहेत.हा मार्ग कफ परेडला बीकेसीशी तर आरेला जेव्हीएलआरशी जोडतो. याआधी पंतप्रधान मोदींनी याच मार्गावरील १२.६९ किमी लांबीच्या फेज १ चे उद्घाटन केले आहे. हे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबर २०२४ मध्ये केले होते. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो गेल्याने बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रोची कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. भूमिगत मेट्रोचे तिकीट एलिवेटेड मेट्रोच्या तुलनेत जास्त आहे. याच कारणामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो भाड्याच्या दरात पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही