Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीPurandar Airport : पुरंदर विमानतळाला गती देण्यासाठी ‘कनेक्टिव्हिटीला’ प्राधान्य!

Purandar Airport : पुरंदर विमानतळाला गती देण्यासाठी ‘कनेक्टिव्हिटीला’ प्राधान्य!

पीएमआरडीएकडून होणार ६३६ कोटींचा खर्च

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Purandar Airport) गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे, जोड रस्त्यांच्या ‘कनेक्टिव्हिटीला’ प्राधान्य देण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अर्थसंकल्प आणि मेट्रोच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात अनेक पर्यायी मार्गांची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भविष्यातील प्रवास सुकर होण्याची शक्यता आहे.

Bhajan : भजनाचा बेरंग! अश्लीलता रोखण्यासाठी आचारसंहिता लागू; भजनाचा तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा होऊ नये यासाठी कडक निर्बंध!

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठीचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. त्यासाठी १ लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या एकात्मिक आराखड्यात पुरंदर विमानतळापर्यंतचा ‘कनेक्ट’ वाढविण्यासाठी मेट्रो मार्गिका, पीएमपीचे नवे मार्ग, पीएमपीचे टर्मिनल, रेल्वे जोड मार्गिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पातही पुरंदर विमानतळापर्यंतची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी अनेक जोड रस्ते, काँक्रिट रस्ते, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते, बाह्यवळण वर्तुळाकार मार्गाला जोडणारे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल ६३६ कोटींचा खर्च येत्या काही वर्षांत पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे.

राजेवाडी स्थानकापासून रेल्वे मार्गिका

पुरंदर येथील विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणे सहज शक्य व्हावे, यासाठी रेल्वेच्या सातारा मार्गावरील राजेवाडी रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत जोड रेल्वे मार्गिका विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. सातारा रेल्वे मार्गावर प्रस्तावित विमानतळाजवळ जेजुरी आणि राजेवाडी ही दोन रेल्वे स्थानके आहेत. त्यातील राजेवाडी हे स्थानक विमानतळापासून नजीक आहे. त्यामुळे राजेवाडी ते विमानतळ या दरम्यान रेल्वेचा स्वतंत्र मार्ग (स्पूर लाइन) विकसित करण्यात येणार आहे. तसेच तळेगाव आणि दौंड स्थानकांना बाह्यवळण रेल्वे मार्गाने जोडण्याचेही नियोजित आहे. त्यासाठी दोन टप्प्यात कामे होणार असून तळेगाव ते शिक्रापूर या दरम्यान उरूळी कांचनपर्यंत पूरक सेवा (फीडर सर्व्हिस) देण्यात येईल.

‘पीएमपी’चेही जाळे

पीएमपीच्या माध्यमातूनही विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी झेंडेवाडी ते वनपुरी हा मार्ग काळेवाडी मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच सासवड येथील पीएमपीच्या टर्मिनलचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. सात इंटर बस टर्मिनलही सासवड येथे असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -