मुंबईतील खाऊगल्लीने पादचाऱ्यांचा अडवला रस्ता

पायवाटेवर टेबल्स टाकून दिली जाते सर्विस


मुंबई : दक्षिण मुंबईतील फॅशन स्टिट येथील खाऊगल्लीतील वाढत्या खवष्यांच्या गर्दीमुळे येथील रस्ताच आता अडवला जात आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवताना स्टॉल्स धारकांकडून रस्ता अडवून बसण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत या खाऊगल्लीतून पादचाऱ्यांना चालण्यासही जागा उरत नसून खाऊगल्लीने आता रस्ताही अडवून टाकल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


चर्चगेट येथील फॅशन स्टिटच्या मागील बाजूस असलेल्या खाऊ गल्लीतील खवय्यांची गर्दी आता वाढत चालली असून प्रत्येक स्टॉल्सधारकांकडून आपल्या समोरील जागेत तीन ते चार टेबल्स लावली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजुला असलेल्या स्टॉल्सधारकांकडून प्रत्येकी आठ ते दहा फुटांची जागा अडवली जात असल्याने संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा अडथळा पार करत रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. आझाद मैदानातून फॅशन स्टीट येथील पायवाटेने खाऊ गल्लीतून चर्चगेट रेल्वे स्थानक गाठले जाते. परंतु संध्याकाळी नेहमीची लोकल पकडण्यासाठी घाईगडबडीत जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या खाऊगल्लीतील गर्दीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


हे स्टॉल्स अधिकृत असले तरी त्यासमोरील जागा ते अडवू शकत नाही. परंतु एवढ्या जागा अडवल्या जात असतानाही महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील पायवाटेच्या जागेवर खुच्र्ष्या टाकून ती जागा अडवण्याचे प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Bus Accidents Mumbai : मानखुर्दमधील बेस्ट बस दुघर्टनेची चौकशी करा, महापौरांनी दिले आदेश

सात महिन्यात बेस्ट बसच्या १० अपघातात १० जणांचे मृत्यू मुंबई : मानखुर्द येथील झालेल्या बेस्ट बस अपघातात (BEST Bus Accident)

Birth Certificate : जन्म दाखल्याच्या प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेचे नियमित होणार लेखापरिक्षण

जन्म दाखले वितरीत करण्याची प्रक्रिया त्वरीत सुरु करण्याची सभागृहाची मागणी प्रमाणपत्रातील नावातील बदलामुळे

BMC : महापालिका प्रशासनात आता तरुणाईचा थेट सहभाग

महापौर जेन नेक्स्ट सिविक फेलोजचा ठराव सभागृहात मंजूर मुंबई : मुंबईतील तरुणांना महानगरपालिकेच्या नागरी

Maharashtra Rain Update : सावधान! उद्या मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे-रायगडला ऑरेंज अलर्ट अलर्ट

- ६० किमी वेगाने वाहणार वारे मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले

BMC : मुंबईकरांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे BMC चे आवाहन

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, नागरिकांनी पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे बृहन्‍मुंबई

Central Railway's Ashadhi Special Train : आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेची भाविकांना भेट! दादर-पंढरपूरदरम्यान धावणार 2 विशेष गाड्या; आरक्षणाला सुरुवात

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य