Diva Water Cut : दिवा शहरातील पाणी पुरवठा १४ फेब्रुवारी रोजी ८ तास बंद राहणार

ठाणे : मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते सायं ६.०० या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत निळजे येथून दिवा येथे प्रभाग क्र. २७ व २८ करीता ५०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलवाहिनीवर उसरघर रेल्वे कल्व्हर्ट पलावा सिटी कंपाऊन्ड येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या अनुषंगाने मुख्य जलवाहिनीवर झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक आहे, ही गळती थांबल्यावर दिवा प्रभाग समिती अंतर्गत आगासन, बेतेवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, मुंब्रा देवी कॉलनी, साबे गाव व दिवा पश्चिम आदी परिसरातील पाण्यासंबधित तक्रारी कमी होतील.


या मुख्य जलवाहिनीवरील गळती बंद करण्याकरीता दि. १४.०२.२०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं ६.०० या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील प्रभाग क्र.२७ व २८ करीता होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला भला मोठा व्हेल मासा...

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

सुरतहून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला! तिघांचा मृत्यू तर चारजण जखमी

नाशिक: सुरतहून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शना घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला केला. काल मध्यरात्री

कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार नव्या मालिकेची मेजवानी! सुचित्रा बांदेकर, विनायक माळी घेऊन येत आहेत ‘मच्छीका पानी’

मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी मराठीतील दैनंदिन मालिका महत्त्वाची भूमिका निभावतात.

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई : यावर्षी दिवाळी

सरकारी रुग्णालयात आता रोज वेगळ्या रंगांच्या चादरी

सुरक्षित उपचार, स्वच्छतेचा नवा आराखडा तयार मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने