'अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज दाखवा, तपास क्राइम ब्रँचकडे सोपवा'

मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा शूटिंगवरुन परतत असताना २४ डिसेंबर २०२४ रोजी अपघात झाला होता. पोयसर मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला होता. अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेत्रीचे कार चालक गजानन पाल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. अभिनेत्री उर्मिलाने या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मागणी केली तरी पोलिसांनी अद्याप अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज दाखवलेले नाही ही बाब निदर्शनास आणून देत उर्मिलाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज दाखवण्यासाठी मुंबई पोलिसांना निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेद्वारे अभिनेत्री उर्मिलाने केली आहे. अपघाताचा तपास स्टेट सीआयडी (क्राईम ब्रँच) यांच्याकडे द्यावा, अशीही मागणी याचिकेद्वारे अभिनेत्री उर्मिलाने केली आहे.



यमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्यासमोर अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या याचिकेची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने बाजू मांडण्यासाठी समता नगर पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीला अथवा त्यांच्या वकिलाला दोन आठवड्यांनी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. समता नगर पोलीस ठाण्याची बाजू समजल्यानंतर उच्च न्यायालय याचिकेतील मागणीबाबत त्यांचा निर्णय देण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल