'अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज दाखवा, तपास क्राइम ब्रँचकडे सोपवा'

मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा शूटिंगवरुन परतत असताना २४ डिसेंबर २०२४ रोजी अपघात झाला होता. पोयसर मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला होता. अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेत्रीचे कार चालक गजानन पाल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. अभिनेत्री उर्मिलाने या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मागणी केली तरी पोलिसांनी अद्याप अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज दाखवलेले नाही ही बाब निदर्शनास आणून देत उर्मिलाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज दाखवण्यासाठी मुंबई पोलिसांना निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेद्वारे अभिनेत्री उर्मिलाने केली आहे. अपघाताचा तपास स्टेट सीआयडी (क्राईम ब्रँच) यांच्याकडे द्यावा, अशीही मागणी याचिकेद्वारे अभिनेत्री उर्मिलाने केली आहे.



यमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्यासमोर अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या याचिकेची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने बाजू मांडण्यासाठी समता नगर पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीला अथवा त्यांच्या वकिलाला दोन आठवड्यांनी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. समता नगर पोलीस ठाण्याची बाजू समजल्यानंतर उच्च न्यायालय याचिकेतील मागणीबाबत त्यांचा निर्णय देण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही