कुटुंबव्यवस्था ढासळल्यामुळे समाजव्यवस्था विस्कळीत

Share

एकत्र कुटुंबात राहायचे म्हटले, तर बंधने आलीत, कर्तव्य-पालन आलं, शिस्त आली, जबाबदारी आली अन् कुटुंबाला अभिप्रेत असलेली मिळून-मिसळून-सर्वांशी जुळवून घेऊन वागण्याची स्वभावप्रवृत्ती आली. आज अशी बंधनं माणसाला नको आहेत.

मीनाक्षी जगदाळे

आपण सातत्याने म्हणतो सामाजिक वातावरण बदलले आहे, परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही, लोकं बदलली, स्वभाव बदलले, माणसांमध्ये नीतिमत्ता, मूल्य राहिली नाहीत, खरेपणा उरला नाही. खरंतर समाज हा अनेक कुटुंबाचा समूह असतो. अनेक प्रकारची, अनेक जाती, धर्म, पंताची कुटुंब एकत्र येऊन एका ठिकाणी वास्तव्य करतात तेव्हा समाज तयार होतो. कोणत्याही गोष्टीची मग ती चांगली असो वा वाईट सुरुवात ही कुटुंबापासून होते. हे कुटुंब म्हणजेच घर मग ते अगदी एक-दोन माणसाचं असो वा वीस-तीस जणांचं असो, त्यातलं वातावरण, संस्कार, त्यातल्या लोकांची वागणूक, स्वभाव, त्यांची कृत्य हेच समाजावर प्रभाव टाकत असतात. या ठिकाणी आपण एक उदाहरणं घेऊ. एका चार- पाच लोकांच्या कुटुंबातील लोकं वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करतात. जसे की एक जण शाळेत शिक्षक आहे तो मुलांना ज्ञान देतो. एक जण पुजारी आहे तो लोकांना मंदिरात पूजेला सहकार्य करतो, त्यांना पुण्य कमवायला हातभार लावतो. त्याच कुटुंबातील एकजण किराणा दुकान चालवतो. लोकांना जीवनावश्यक गोष्टी पुरवून स्वतःचा उदरनिर्वाह करतो. एकजण भाजीपाला विकतो आणि ग्राहकाला रोज ताजी भाजी पुरवतो आणि शेतकऱ्यांना पोट भरायला मदत करतो. म्हणजेच या कुटुंबातील प्रत्येकजण समाजासाठी काहीना काही योगदान चांगल्या मार्गाने देतात आणि स्वतः पण अर्थार्जन करतात. या उलट दुसऱ्या एका कुटुंबात दोन-तीन लोकं असून त्यातील एक जण दररोज लोकांना लुबाडणे, चोऱ्या करणे यासारखे कामं करतो, त्याच घरातील दुसरा व्यक्ती हा चोरून आणलेला माल विल्हेवाट लावतो आणि तिसरा या दोघांच्या चोऱ्या चुकीचा धंदा समाजापासून लपवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करत असतो. लोकांना वेगवेगळी कारणं देऊन समाजाची दिशाभूल करत असतो.

आता आपण राहत असलेल्या समाजात दोन प्रकारची कुटुंब आहेत जे समाजात चांगल्या वाईट गोष्टी घडायला किंवा घडवायला कारणीभूत ठरत आहेत. एखादा सभ्य सुसंस्कृत साधा माणूस जर चोर भामट्याकडून लुबाडला गेला तर तो नशिबाचा भाग म्हणून जे गेलं ते सोडून देईल. एखादा सुशिक्षित असेल तर तो कायदेशीर मार्गाने जाऊन ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. एखादा अर्धवट किंवा विकृत मनोवृत्तीचा असेल तर तो त्या चोराला शोधून मारहाण करेल, त्याला जीवे मारेल, शिवीगाळ करेल थोडक्यात तो हिंसाचार मार्ग अवलंबून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणजेच याठिकाणी दोन कुटुंबात वितुष्ठ आलं, दुश्मनी आली, भांडण आलं आणि दोन कुटुंबातील हा वाद त्यांच्या पुरता न राहता आता सामाजिक विषय बनला आहे. अशाप्रकारे छोट्या छोट्या गोष्टी ज्या घरोघरी घडतात त्याच समाजावर छाप टाकत असतात आणि कुटुंबांना धाक न राहिल्यामुळे, मर्यादा न राहिल्यामुळे घरातील गोष्टी बाहेर येऊन त्याचं बाजारीकरण होऊ लागलं आहे आणि समाजात हे विष पसरू लागलं आहे. एकत्र कुटुंब पद्धती संपवून छोटी छोटी कुटुंब तयार होत चालल्यामुळे एकमेकांना सामावून घेणे, समजावून घेणे, सांभाळून घेणे होत नाही. मनातल्या गोष्टी घरात बोलल्या जात नाहीत तर त्या घराबाहेरील लोकांकडे व्यक्त केल्या जातात. ज्यांच्याकडे त्या व्यक्त होतात ते जर तितकेच योग्य विचारसरणीचे नसतील तर आपल्याला दिशाहीन करतात आणि आयुष्य भरकटले जाते. असे घरोघरी प्रत्येकासोबत होत असल्यामुळे समाजच चुकीच्या दिशेने वाहत जातो.

अजून एक उदाहरणं म्हणजे जेव्हा कोणत्याही घरातील पती अथवा पत्नी विवाहबाह्य संबंध ठेवते तेव्हा ती किंवा तो दुसऱ्या कुटुंबाला म्हणजेच कोणाच्या तरी पतीला अथवा पत्नीला त्रासदायक ठरत असते, कोणाचे तरी घर संसार मोडत असते. म्हणजेच एका कुटुंबातील व्यक्तीमुळे दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीला त्रास होत असतो. पर्यायाने दोन्ही कुटुंबातील लोकांना त्रास होऊन समाजाचे हे घटक भविष्यात. कोणत्याही भयानक परिणामांचे बळी ठरू शकतात. आता ज्याची पत्नी किंवा जिचा पती विवाहबाह्य संबंध ठेवतोय ती व्यक्ती पण विचार करते आपण सुद्धा असे करायला काय हरकत आहे? आपण का एकटं राहायचं? आपण का अन्याय सहन करायचा आणि आपलं मन मारून जगायचं? मग ती व्यक्ती पण कुठे न कुठे स्वतःला गुंतवते, स्वतःसाठी कोणीतरी शोधते आणि अजून एक कुटुंब डिस्टर्ब होते. असं होतं होत ही विवाहबाह्य संबंधाची साखळी कधी संपत नाही आणि समाजात अनैतिक संबंध फोफावले जातात. अशावेळी आपण म्हणतो आजकाल समाजात विवाहबाह्य संबंध खूप वाढले आहेत पण त्याची सुरुवात कुटुंबापासूनच झाली हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
जेव्हा कोणतीही घटना आपल्या घराबाहेर जाते तेव्हा ती सामाजिक विषय बनते आणि समाज रचना बिघडते. म्हणूनच आपण म्हणतो घराबाहेर काही जायला नको. त्यामुळे इज्जत जाते, बदनामी होते, लोकं आपल्याबद्दल चुकीचं बोलतात, आपला अप प्रचार होतो. हे जर टाळायचं असेल तर कुटुंबाला शिस्त असणं, संस्कार असणं खूप महत्वाचे आहे.
meenonline@gmail.com

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

49 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

8 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

9 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago