'आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल'

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल, असे भाकीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले तर आम आदमी पार्टीचा पराभव झाला. यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल, असे भाकीत वर्तवले आहे.



भारतीय जनता पार्टीने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची निवडणूक जिंकली. यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एकाधिकारशाहीबाबत बोलले. सत्ता होती म्हणून अनेकांनी केजरीवाल यांची एकाधिकारशाही खपवून घेतली. आता केजरीवाल यांच्यावर टीका करण्यास आणि त्यांचे दोष जाहीर करण्यास सुरुवात होईल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.



दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४३ जागांवर भाजपाचा विजय झाला. तसेच भाजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. तर २१ जागांवर आपचा विजय झाला आणि ते एका जागेवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय पक्ष अशी ओळख मिरवणाऱ्या काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकणे जमलेले नाही. काँग्रेसने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत शून्य जागा जिंकण्याची हॅटट्रिक केली. तर आपचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी सत्ता गमावली. माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री आणि आपचे संस्थापक सदस्य आणि प्रमुख नेते असलेले मनीष सिसोदिया या दोघांचा पराभव झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी या कालकाजी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत जिंकल्या. या निकालावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, आम आदमी पार्टीने मागील १० वर्षे दिल्लीकरांची फसवणूक केली. आम आदमी पार्टीने अनेक आश्वासने पूर्ण केली नाही. वेगवेगळ्या योजना जाहीर करुन केजरीवाल आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे काम केले, असाही आरोप केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केला.

आतिशी यांना भेटा आणि विचारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना मिळालेल्या कार्यकाळात निर्णय घेण्यासाठी किती स्वातंत्र्य होते ? या प्रश्नाच्या उत्तरातच केजरीवालांच्या एकाधिकारशाहीची माहिती मिळेल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले. दिल्लीच्या निकालाचा परिणाम २०२७ मध्ये पंजाबच्या विधानसभा निवडणुकीवरही दिसू शकतो. भाजपाची पंजाबमधील कामगिरी सुधारू शकते, असेही भाकीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वर्तविले.
Comments
Add Comment

भारतीय सैनिकांना मिळाल्या शत्रूला दणका देणार प्रहार लाईट मशिन गन

ग्वाल्हेर : भारतीय लष्कराचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या तब्बल दोन हजार

Middle East War Beer Price Hike : आता 'चीअर्स' करणं पडणार महाग! मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बियर महागणार ? वाचा सविस्तर

मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी