'आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल'

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल, असे भाकीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले तर आम आदमी पार्टीचा पराभव झाला. यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल, असे भाकीत वर्तवले आहे.



भारतीय जनता पार्टीने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची निवडणूक जिंकली. यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एकाधिकारशाहीबाबत बोलले. सत्ता होती म्हणून अनेकांनी केजरीवाल यांची एकाधिकारशाही खपवून घेतली. आता केजरीवाल यांच्यावर टीका करण्यास आणि त्यांचे दोष जाहीर करण्यास सुरुवात होईल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.



दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४३ जागांवर भाजपाचा विजय झाला. तसेच भाजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. तर २१ जागांवर आपचा विजय झाला आणि ते एका जागेवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय पक्ष अशी ओळख मिरवणाऱ्या काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकणे जमलेले नाही. काँग्रेसने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत शून्य जागा जिंकण्याची हॅटट्रिक केली. तर आपचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी सत्ता गमावली. माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री आणि आपचे संस्थापक सदस्य आणि प्रमुख नेते असलेले मनीष सिसोदिया या दोघांचा पराभव झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी या कालकाजी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत जिंकल्या. या निकालावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, आम आदमी पार्टीने मागील १० वर्षे दिल्लीकरांची फसवणूक केली. आम आदमी पार्टीने अनेक आश्वासने पूर्ण केली नाही. वेगवेगळ्या योजना जाहीर करुन केजरीवाल आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे काम केले, असाही आरोप केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केला.

आतिशी यांना भेटा आणि विचारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना मिळालेल्या कार्यकाळात निर्णय घेण्यासाठी किती स्वातंत्र्य होते ? या प्रश्नाच्या उत्तरातच केजरीवालांच्या एकाधिकारशाहीची माहिती मिळेल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले. दिल्लीच्या निकालाचा परिणाम २०२७ मध्ये पंजाबच्या विधानसभा निवडणुकीवरही दिसू शकतो. भाजपाची पंजाबमधील कामगिरी सुधारू शकते, असेही भाकीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वर्तविले.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव