Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत

खा. उदयनराजे भोसले यांनी केला संताप व्यक्त


नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलेल्या राहुल सोलापूरक सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले. देशातील महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. राहुल सोलापूरकर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे म्हणाले.


खासदार उदयनराजे भोसले दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल सोलापूरकरच्या विधानावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला विचार दिले. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही वेगवेगळ्या जातीच्या लोकांना त्यांनी कुटुंब म्हणून पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही.



राहुल सोलापूर कोण आहे? अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. या सगळ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे. या लोकांना गाडले पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाहीत तर देशाचे तुकडे होतील, असे ते म्हणाले.


उदयनराजे भोसले म्हणाले की, खासदार, आमदार, मंत्री, उद्योजक कोणी असला आणि असे विधान केले तर कोणालाही सोडायला नको. त्यांना ठेचून गाडले पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे, असे ते म्हणाले. यांना वेळीच आळा घातला नाही तर आपला इतिहास वेगळा वळण घेईल, असे ते म्हणाले. औरंगजेब हरामखोरहोता. तू (राहुल) कमी हरामखोर आहेस का ? तू औरंगजेबाची औलाद आहेस असं वाटते, असा घणाघात त्यांनी केला.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या