Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत

खा. उदयनराजे भोसले यांनी केला संताप व्यक्त


नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलेल्या राहुल सोलापूरक सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले. देशातील महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. राहुल सोलापूरकर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे म्हणाले.


खासदार उदयनराजे भोसले दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल सोलापूरकरच्या विधानावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला विचार दिले. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही वेगवेगळ्या जातीच्या लोकांना त्यांनी कुटुंब म्हणून पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही.



राहुल सोलापूर कोण आहे? अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. या सगळ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे. या लोकांना गाडले पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाहीत तर देशाचे तुकडे होतील, असे ते म्हणाले.


उदयनराजे भोसले म्हणाले की, खासदार, आमदार, मंत्री, उद्योजक कोणी असला आणि असे विधान केले तर कोणालाही सोडायला नको. त्यांना ठेचून गाडले पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे, असे ते म्हणाले. यांना वेळीच आळा घातला नाही तर आपला इतिहास वेगळा वळण घेईल, असे ते म्हणाले. औरंगजेब हरामखोरहोता. तू (राहुल) कमी हरामखोर आहेस का ? तू औरंगजेबाची औलाद आहेस असं वाटते, असा घणाघात त्यांनी केला.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये