टीडीएस मर्यादा बदलून केंद्र सरकारने नागरिकांना दिली भेट

  106

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशासाठी अर्थसंकल्प जाहीर करताना टीडीएस मर्यादेत बदल केल्याचे सांगितले. टीडीएस मर्यादा बदलून केंद्र सरकारने नागरिकांना एक भेट दिली आहे. या भेटीचा फायदा प्रामुख्याने विमा एजंट, शेअर बाजारात गुंतवणूक करणारे, ब्रोकर, ब्रोकर फर्म चालविणारे, विविध तांत्रिक सेवा देणारे यांना होणार आहे.



आधी भाड्याने दिलेल्या मालमत्तेतून मिळणाऱ्या वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला टीडीएसमधून सूट होती. आता भाड्याने दिलेल्या मालमत्तेतून मिळणाऱ्या वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला टीडीएसमधून सूट देण्यात आली आहे. पण ही सूट देताना दरमहा कमाल मर्यादा ५० हजार ठेवण्यात आली आहे.



जर भाड्याने दिलेल्या मालमत्तेतून दरमहा ६० हजार रुपये या पद्धतीने १ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ असा दहा महिन्यांचा करार झाला. नंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मालमत्ता भाड्याने दिली नसेल तर भाड्यातून मिळालेले वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये एवढेच असेल. पण दरमहा ५० हजार रुपयांपर्यंतच्या भाड्याला करातून माफ करण्यात आले आहे. इथे करारामुळे दरमहा ६० हजार रुपये मिळत आहेत.या रकमेवर कर लागू आहे. यासाठीच भाडेकरार करताना टीडीएस बाबतचे नियम समजून घेणे हिताचे आहे.



टीडीएसबाबत घेतलेले इतर निर्णय

  1. सिक्युरिटीजवरील व्याजावरील टीडीएस मर्यादा दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली

  2. लाभांशावरील टीडीएस सूट पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपये करण्यात आली.

  3. म्युच्युअल फंड आणि कंपनीच्या शेअरहोल्डिंगमधून पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेवरील टीडीएस मर्यादा दहा हजार रुपये करण्यात आली आहे.

  4. ब्रोकरेजवरील कमिशनची मर्यादा १५ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात आली.

  5. तांत्रिक सेवेतून मिळणाऱ्या रकमेची मर्यादा ३० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे