टीडीएस मर्यादा बदलून केंद्र सरकारने नागरिकांना दिली भेट

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशासाठी अर्थसंकल्प जाहीर करताना टीडीएस मर्यादेत बदल केल्याचे सांगितले. टीडीएस मर्यादा बदलून केंद्र सरकारने नागरिकांना एक भेट दिली आहे. या भेटीचा फायदा प्रामुख्याने विमा एजंट, शेअर बाजारात गुंतवणूक करणारे, ब्रोकर, ब्रोकर फर्म चालविणारे, विविध तांत्रिक सेवा देणारे यांना होणार आहे.



आधी भाड्याने दिलेल्या मालमत्तेतून मिळणाऱ्या वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला टीडीएसमधून सूट होती. आता भाड्याने दिलेल्या मालमत्तेतून मिळणाऱ्या वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला टीडीएसमधून सूट देण्यात आली आहे. पण ही सूट देताना दरमहा कमाल मर्यादा ५० हजार ठेवण्यात आली आहे.



जर भाड्याने दिलेल्या मालमत्तेतून दरमहा ६० हजार रुपये या पद्धतीने १ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ असा दहा महिन्यांचा करार झाला. नंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मालमत्ता भाड्याने दिली नसेल तर भाड्यातून मिळालेले वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये एवढेच असेल. पण दरमहा ५० हजार रुपयांपर्यंतच्या भाड्याला करातून माफ करण्यात आले आहे. इथे करारामुळे दरमहा ६० हजार रुपये मिळत आहेत.या रकमेवर कर लागू आहे. यासाठीच भाडेकरार करताना टीडीएस बाबतचे नियम समजून घेणे हिताचे आहे.



टीडीएसबाबत घेतलेले इतर निर्णय

  1. सिक्युरिटीजवरील व्याजावरील टीडीएस मर्यादा दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली

  2. लाभांशावरील टीडीएस सूट पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपये करण्यात आली.

  3. म्युच्युअल फंड आणि कंपनीच्या शेअरहोल्डिंगमधून पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेवरील टीडीएस मर्यादा दहा हजार रुपये करण्यात आली आहे.

  4. ब्रोकरेजवरील कमिशनची मर्यादा १५ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात आली.

  5. तांत्रिक सेवेतून मिळणाऱ्या रकमेची मर्यादा ३० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव