अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या झाली. तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे.



तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.



ज्या तरुणीची हत्या झाली ती आणि एका तरुणासोबत अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावरुन जात होती. पुलावरुन जात असताना तरुण आणि तरुणी यांच्यात कुठल्यातरी मुद्यावरुन वाद झाला. यानंतर तरुणाने धारदार शस्त्राने तरुणीवर एकामागून एक वार केले. धारदार शस्त्राने सपासप वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात तरुणीवर वार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तरुणाची कसून चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

...तर गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द होणार?

नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली जाण्याची शक्यता मुंबई :  गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या