अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या झाली. तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे.



तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.



ज्या तरुणीची हत्या झाली ती आणि एका तरुणासोबत अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावरुन जात होती. पुलावरुन जात असताना तरुण आणि तरुणी यांच्यात कुठल्यातरी मुद्यावरुन वाद झाला. यानंतर तरुणाने धारदार शस्त्राने तरुणीवर एकामागून एक वार केले. धारदार शस्त्राने सपासप वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात तरुणीवर वार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तरुणाची कसून चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम