अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या झाली. तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे.



तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.



ज्या तरुणीची हत्या झाली ती आणि एका तरुणासोबत अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावरुन जात होती. पुलावरुन जात असताना तरुण आणि तरुणी यांच्यात कुठल्यातरी मुद्यावरुन वाद झाला. यानंतर तरुणाने धारदार शस्त्राने तरुणीवर एकामागून एक वार केले. धारदार शस्त्राने सपासप वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात तरुणीवर वार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तरुणाची कसून चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.