भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाची १०० वर्षे

मुंबई : व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला या १६ किमी. च्या मार्गावर ३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिली विद्युत लोकल धावली. ही भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाची सुरुवात (electrification of Indian Railways) होती. या ऐतिहासिक घटनेला सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ रोजी १०० वर्षे झाली. या १०० वर्षात भारतीय रेल्वेत अनेक क्रांतीकारी बदल झाले.



भारतात विजेवर पहिल्यांदा लोकल धावली त्यावेळी १.५ केव्ही डीसी ओव्हरहेड वायर प्रणालीचा वापर करण्यात आला. या रेल्वेनं ८० किलोमीटर प्रति तास वेगानं धावण्याची क्षमता दाखवली. त्या काळात ब्रिटीशकालीन लोकलमध्ये चार डबे होते. पोलाद आणि लाकूड यांचा मेळ साधून हे डबे तयार करण्यात आले होते. रेल्वेच्या डब्याचे फ्लोरिंग लाकडाचे होते. बाकड्यांसाठी पण लाकडू वापरले जात होते. उर्वरित डबा हा पोलादाचा वापर करुन तयार केला जात होता. वाफेच्या इंजिनाच्या तुलनेत विजेवर चालणारे इंजिन जास्त वेगवान होते. शिवाय वाफेच्या इंजिनमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी विजेचे इंजिन हा उत्तम पर्याय असल्याचे लक्षात आले. यामुळे रेल्वेच्या विद्युतीकरणाला वेग देण्याचा निर्णय झाला. मध्य रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण २३ फेब्रुवारी २०२३ रोजी १०० टक्के पूर्ण झाले. याआधी १९२७ मध्ये आठ डब्यांची १९६१ मध्ये नऊ डब्यांची, १९८६ मध्ये बारा डब्यांची लोकल सुरू झाली.



इलेक्ट्रिक रेल्वेची सुरुवात जर्मनीत झाली. जर्मनीनं १८७९ मध्ये पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सुरू केली. इलेक्ट्रिक रेल्वे सुरू करणारा भारत जगातील २४ वा आणि आशियातील तिसरा देश झाला. मुंबईतील रेल्वेच्या विद्युतीकरण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर, दक्षिण आणि पूर्व भारतातील विद्युतीकरण करण्यास सुरुवात झाली. दक्षिण भारतातील मद्रास म्हणजे आताचे चेन्नई – तांबरम मार्गाचे विद्युतीकरण १९३१ मध्ये करण्यात आलं. भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत देशात ३८८ किमी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. त्यानंतर १९५० मध्ये कोलकात्यात विद्युतीकरणाला गती मिळाली. पुढं डिसेंबर १९५७ मध्ये हावडा ते शियोराफुली दरम्यान पूर्व भारतातील पहिला इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग सुरू झाला.



देशातील संपूर्ण रेल्वे जाळ्याच्या विद्युतीकरणाचे काम २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अनेक ठिकाणी काम वेगाने सुरू आहे. भारतीय रेल्वेने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर अधिकाधिक करुन वंदे भारत आणि बुलेट ट्रेनसारख्या हायस्पीड रेल्वेगाड्यांसाठी स्वच्छ ऊर्जा प्रणाली विकसित करण्यावर भर दिला आहे. रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात आहे. भारतीय रेल्वे हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत यासाठीचे काम सुरू आहे. हायड्रोजनवर धावणारी ट्रेन सुरू झाली तर शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साधण्यास मदत होईल. रेल्वेने १२०० अश्वशक्ती क्षमतेचे इंजिन वापरणाऱ्या ३५ हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. लवकरच हरियाणामध्ये जिंद-सोनीपत मार्गावर पहिल्या भारतीय हायड्रोजन ट्रेनची चाचणी होणार आहे.
Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.