Pune News : माघी गणेश जयंतीनिमित्त पुणे वाहतुकीत बदल!

'असे' असतील पर्यायी मार्ग 


पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहे. यामुळे या मार्गावर होणारी गर्दी पाहता तसेच भाविकांच्या सोईसाठी मध्य पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे वाहतूक विभागाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यातआली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे मात्र, शिवाजीनगर ते स्वारगेटला जाणाऱ्या प्रवाशांची मात्र, मोठी गैरसोय होणार आहे.



श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात उद्या सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस, तसेच अन्य वाहनांनी स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता, खंडोबीजाबाबा चौक, टिळक चौकमार्गे स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.


त्याचबरोबर स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी झाशीची राणी चौकातून महापालिका भवनकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चैाकमार्गे इच्छितस्थळी जावे. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध