Vikroli News : घरातून लग्नाला नकार मिळाल्याने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळीत दोन तरुण प्रेमी युगुलाने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या दोघांनी धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली.



काल (दि २६) रोजी दुपारच्या सुमारास एका तरुण प्रेमी युगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली. घरातून लग्नाला नकार देत असल्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील मुलीचे वय १५ असून ती परप्रांतीय आहे तर मुलाचं वय १९ असून तो महाराष्ट्रीयन आहे. ही मुलगी भांडुप येथील हनुमाननगर मध्ये राहत असून ती रविवारी दुपारच्या सुमारास घरातून आजीसोबत बाहेर निघाली मात्र आजीचा डोळा चुकवून ती गायब झाली. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र, काही वेळाने रेल्वे पोलिसांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधला आणि थेट तिच्या मृत्यूची माहिती मिळाली.


या प्रेमी युगुलांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या प्रेमी युगुलांनी आत्महत्या जातीवादातून केली की यामागे अजून काही कारण असेल याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.