Vikroli News : घरातून लग्नाला नकार मिळाल्याने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळीत दोन तरुण प्रेमी युगुलाने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या दोघांनी धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली.



काल (दि २६) रोजी दुपारच्या सुमारास एका तरुण प्रेमी युगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली. घरातून लग्नाला नकार देत असल्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील मुलीचे वय १५ असून ती परप्रांतीय आहे तर मुलाचं वय १९ असून तो महाराष्ट्रीयन आहे. ही मुलगी भांडुप येथील हनुमाननगर मध्ये राहत असून ती रविवारी दुपारच्या सुमारास घरातून आजीसोबत बाहेर निघाली मात्र आजीचा डोळा चुकवून ती गायब झाली. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र, काही वेळाने रेल्वे पोलिसांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधला आणि थेट तिच्या मृत्यूची माहिती मिळाली.


या प्रेमी युगुलांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या प्रेमी युगुलांनी आत्महत्या जातीवादातून केली की यामागे अजून काही कारण असेल याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक

मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम