Vikroli News : घरातून लग्नाला नकार मिळाल्याने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळीत दोन तरुण प्रेमी युगुलाने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या दोघांनी धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली.



काल (दि २६) रोजी दुपारच्या सुमारास एका तरुण प्रेमी युगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली. घरातून लग्नाला नकार देत असल्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील मुलीचे वय १५ असून ती परप्रांतीय आहे तर मुलाचं वय १९ असून तो महाराष्ट्रीयन आहे. ही मुलगी भांडुप येथील हनुमाननगर मध्ये राहत असून ती रविवारी दुपारच्या सुमारास घरातून आजीसोबत बाहेर निघाली मात्र आजीचा डोळा चुकवून ती गायब झाली. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र, काही वेळाने रेल्वे पोलिसांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधला आणि थेट तिच्या मृत्यूची माहिती मिळाली.


या प्रेमी युगुलांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या प्रेमी युगुलांनी आत्महत्या जातीवादातून केली की यामागे अजून काही कारण असेल याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर