Vikroli News : घरातून लग्नाला नकार मिळाल्याने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळीत दोन तरुण प्रेमी युगुलाने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या दोघांनी धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली.



काल (दि २६) रोजी दुपारच्या सुमारास एका तरुण प्रेमी युगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली. घरातून लग्नाला नकार देत असल्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील मुलीचे वय १५ असून ती परप्रांतीय आहे तर मुलाचं वय १९ असून तो महाराष्ट्रीयन आहे. ही मुलगी भांडुप येथील हनुमाननगर मध्ये राहत असून ती रविवारी दुपारच्या सुमारास घरातून आजीसोबत बाहेर निघाली मात्र आजीचा डोळा चुकवून ती गायब झाली. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र, काही वेळाने रेल्वे पोलिसांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधला आणि थेट तिच्या मृत्यूची माहिती मिळाली.


या प्रेमी युगुलांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या प्रेमी युगुलांनी आत्महत्या जातीवादातून केली की यामागे अजून काही कारण असेल याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन