भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन, कर्तव्यपथावर जोरदार तयारी, अमेरिकेने दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली: देशात आज ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात याचा उत्साह पाहायला मिळत आहे. कर्तव्यपथावरही जोरदार तयारी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून देशाचे नेतृत्व करतील.


यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे एक अनोखे मिश्रण आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे आहेत. सकाळी साडेदहा वाजता या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तसेच पुढील ९० मिनिटे हा कार्यक्रम सुरू असेल. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे फ्लाय पोस्ट असेल. यात भारताच्या हवाई दलाच्या विमानांचे शानदार प्रदर्शन पाहायला मिळेल.


भारताच्या हवाई दलाची ताकद यातून दिसेल. सुमारे 10 हजार विशेष अतिथींना संचलन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील हे विशेष अतिथी ‘स्वर्णिम भारत’चे शिल्पकार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच सरकारच्या योजनांचा उत्तम वापर करणाऱ्यांचा समावेश आहे.


 


अमेरिकेने भारताला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा


अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिया यांनी भारताला प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या विधानात म्हटले की अमेरिकेकडून भारताच्या लोकांना त्यांच्या प्रजासत्ताक दिनाबद्दल मी शुभेच्छा देते.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना