Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीनगरपालिकेकडून नागरिकांच्या डोळ्यात पुन्हा एकदा 'धुळफेक'

नगरपालिकेकडून नागरिकांच्या डोळ्यात पुन्हा एकदा ‘धुळफेक’

ठेकेदाराची मनमानी : प्रशासनाचे दुर्लक्ष

नागरीकांच्या आरोग्याशी खेळ; व्यक्त होतोय संताप

सावंतवाडी : शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण करत असताना डांबरीकरणानंतर मारण्यात येणाऱ्या ग्रिटमध्ये डस्टचे प्रमाण जास्त असल्याने होत असलेल्या धुरळ्यामुळे सावंतवाडीकर नागरिकांसह प्रवासी देखील त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराची मनमानी व पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या थेट आरोग्याशीच हा खेळ मांडला गेला असून त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनावर कोणाचाच अंकुश नसल्यामुळे आता दाद मागायची तर ती कोणाकडे असावा नाही नागरिक उपस्थित करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी शहरातील बाजारपेठेत रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले होते. यावेळी संबंधित ठेकेदाराकडून कामाचा दर्जा राखला न गेल्याची तक्रार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली होती. तसेच डांबरीकरण झाल्यावर त्यावर टाकण्यात येणाऱ्या ग्रिटमध्ये डस्टचे प्रमाण जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात धुरळा झाल्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. या विरोधात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी आवाज देखील उठविला होता. मात्र, आजतागायत त्यावर कोणतीही उपाययोजना केली न गेल्यामुळे नागरिकांना त्या धुळ्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कणकवली, बांदा, कुडाळ, ओरोस परिसरातल्या नद्यांमधील गाळ काढण्याची कामे १ फेब्रुवारीपासून सुरु करणार

त्यातच दोन दिवसापासून सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका परिसरात काही वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या गॅस पाईप लाईनसाठी खोदलेल्या रस्त्याचे नूतनीकरण काम हाती घेण्यात आले आहे. त्या ठिकाणी देखील तशाच प्रकारे ठेकेदाराकडून ग्रिट मारण्यात आल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नाका तोंडात धुरळा जात असल्याने नागरिकांना तसेच वाहनधारकांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

या विरोधात वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून पालिका प्रशासन जाणून-बुजून या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे का असं संतप्त सवाल नागरिक तसेच वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे.

सद्यस्थितीत पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असल्यामुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसल्यानेच हे प्रकार घडत आहेत असा थेट आरोप देखील नागरिकांनी केला असून ठेकेदाराची मनमानी व पालिकेचा अक्षम्य दुर्लक्ष याला जबाबदार असून आता न्याय तरी कोणाकडे मागायचा असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -