बांगलादेश सीमेवर बीएसएफची गस्त वाढवली

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष निर्देश


कोलकाता: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ) अतिरिक्त महासंचालकांनी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना गस्त वाढवण्याचे आणि कुंपण नसलेल्या सीमांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी, बीएसएफने भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा आणि सीमा चौक्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठी त्यांच्या सर्व फील्ड फॉर्मेशन्समध्ये 'ऑप्स अलर्ट' सुरू केला आहे. या कालावधीत भारत-बांगलादेश सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल ते मेघालयापर्यंत भारताची बांगलादेशशी ४,०९६ किमी लांबीची सीमा आहे. बीएसएफचे मुख्य विशेष महासंचालक (पूर्व कमांड) चे जनसंपर्क अधिकारी यांनी गुरुवारी सांगितले की, या बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक (पूर्व कमांड) रवी गांधी यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. बीएसएफच्या ऑपरेशनल तयारी आणि धोरणात्मक तैनातीवर लक्ष ठेवण्यासाठी गांधी स्वत: बंगालच्या सीमावर्ती भागाला भेट देत आहेत. अतिरिक्त महासंचालकांनी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत आणि विशेषतः नदीच्या किनारी आणि कुंपण नसलेल्या सीमांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकाऱ्याने सांगितले की, 'ऑप्स अलर्ट' सराव दरम्यान, बीएसएफचे जवान सीमेवर आणि सीमेजवळील अंतर्गत भागात विविध सुरक्षा सराव करतील. याशिवाय, सीमेवर घडणाऱ्या घटनांना तोंड देण्यासाठी विविध ऑपरेशनल प्रक्रियेच्या प्रमाणीकरणासह सीमावर्ती लोकसंख्येच्या क्षेत्रांशी संवाद साधण्याचे कार्यक्रमही आयोजित केले जातील. हा 'ऑप्स अलर्ट' सराव बुधवारपासून सुरू झाला असून आगामी 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

Comments
Add Comment

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे