बांगलादेश सीमेवर बीएसएफची गस्त वाढवली

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष निर्देश


कोलकाता: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ) अतिरिक्त महासंचालकांनी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना गस्त वाढवण्याचे आणि कुंपण नसलेल्या सीमांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी, बीएसएफने भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा आणि सीमा चौक्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठी त्यांच्या सर्व फील्ड फॉर्मेशन्समध्ये 'ऑप्स अलर्ट' सुरू केला आहे. या कालावधीत भारत-बांगलादेश सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल ते मेघालयापर्यंत भारताची बांगलादेशशी ४,०९६ किमी लांबीची सीमा आहे. बीएसएफचे मुख्य विशेष महासंचालक (पूर्व कमांड) चे जनसंपर्क अधिकारी यांनी गुरुवारी सांगितले की, या बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक (पूर्व कमांड) रवी गांधी यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. बीएसएफच्या ऑपरेशनल तयारी आणि धोरणात्मक तैनातीवर लक्ष ठेवण्यासाठी गांधी स्वत: बंगालच्या सीमावर्ती भागाला भेट देत आहेत. अतिरिक्त महासंचालकांनी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत आणि विशेषतः नदीच्या किनारी आणि कुंपण नसलेल्या सीमांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकाऱ्याने सांगितले की, 'ऑप्स अलर्ट' सराव दरम्यान, बीएसएफचे जवान सीमेवर आणि सीमेजवळील अंतर्गत भागात विविध सुरक्षा सराव करतील. याशिवाय, सीमेवर घडणाऱ्या घटनांना तोंड देण्यासाठी विविध ऑपरेशनल प्रक्रियेच्या प्रमाणीकरणासह सीमावर्ती लोकसंख्येच्या क्षेत्रांशी संवाद साधण्याचे कार्यक्रमही आयोजित केले जातील. हा 'ऑप्स अलर्ट' सराव बुधवारपासून सुरू झाला असून आगामी 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

Comments
Add Comment

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे