Anil Bonde : राहुल गांधी हे 'पप्पू टप्पू उडान टप्पू'- खा. अनिल बोंडे

अमरावती : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ छाटायला नको तर जिभेला चटके द्यायला पाहिजे असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष केले आहे. 'पप्पू टप्पू उडान टप्पू' म्हणत बोंडे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.


खासदार डॉ. अनिल बोंडे पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासोबत अंदमान निकोबार बेटाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या हिंदी राजभाषा समितीच्या निमित्याने त्यांचा हा दौरा होत आहे. दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सेल्युलर तुरुंगातील काळकोठडीला भेट दिली. ज्या ठिकाणी सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली त्या कोठडीत जाऊन अनिल बोंडे यांनी सावरकरांचे स्मरण केले. त्या कोठडीत काही काळ ध्यानही केले. तसेच सावरकरांच्या पावन स्मृतीला आपण नमन करत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.



दहा वर्षापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या कोठडीत वास्तव्य केले. जी माणसे वीर सावरकरांवर टीका करतात, त्यांनी या कोठडीत एकदा येऊन बधावे. सात दिवस राहून पाहावे. इथला कोल्हू चालवावा. तुरुंगातले कपडे घालावे त्यावेळी काँग्रेस आणि समस्त टीकाकारांना सावरकरांचे देशासाठी काय बलिदान होते, त्यांनी देशासाठी काय त्याग केला, हे लक्षात आल्याशिवाय राहणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सोबतच सावरकरांचा त्याग अंदमानात येऊन अनुभवण्याचाही सल्ला डॉ. बोंडे यांनी दिला. असे असतानाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर म्हणून हिनविणाऱ्या राहुल गांधी यांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

Navi Mumbai : कामोठे येथे सिलिंडर स्फोटानंतर घरात आग; दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने