Anil Bonde : राहुल गांधी हे 'पप्पू टप्पू उडान टप्पू'- खा. अनिल बोंडे

  53

अमरावती : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ छाटायला नको तर जिभेला चटके द्यायला पाहिजे असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष केले आहे. 'पप्पू टप्पू उडान टप्पू' म्हणत बोंडे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.


खासदार डॉ. अनिल बोंडे पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासोबत अंदमान निकोबार बेटाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या हिंदी राजभाषा समितीच्या निमित्याने त्यांचा हा दौरा होत आहे. दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सेल्युलर तुरुंगातील काळकोठडीला भेट दिली. ज्या ठिकाणी सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली त्या कोठडीत जाऊन अनिल बोंडे यांनी सावरकरांचे स्मरण केले. त्या कोठडीत काही काळ ध्यानही केले. तसेच सावरकरांच्या पावन स्मृतीला आपण नमन करत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.



दहा वर्षापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या कोठडीत वास्तव्य केले. जी माणसे वीर सावरकरांवर टीका करतात, त्यांनी या कोठडीत एकदा येऊन बधावे. सात दिवस राहून पाहावे. इथला कोल्हू चालवावा. तुरुंगातले कपडे घालावे त्यावेळी काँग्रेस आणि समस्त टीकाकारांना सावरकरांचे देशासाठी काय बलिदान होते, त्यांनी देशासाठी काय त्याग केला, हे लक्षात आल्याशिवाय राहणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सोबतच सावरकरांचा त्याग अंदमानात येऊन अनुभवण्याचाही सल्ला डॉ. बोंडे यांनी दिला. असे असतानाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर म्हणून हिनविणाऱ्या राहुल गांधी यांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी