Salman Khan : बिग बॉसच्या शो ला अभिनेता सलमान खानचा राम राम!

मुंबई : बिग बॉसच्या १८ व्या सीझनचा अंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून यंदाचा सिझन करणवीर मेहरा जिंकला आहे. गेल्या १४ वर्षांपासून बिग बॉसचं होस्टिंग अभिनेता सलमान खान करत आहे.मात्र आता यापुढे बिग बॉसचा होस्ट म्हणून सलमान दिसणार नाही.


बिग बॉस १८च्या महाअंतिम फेरीत सलमान खानने यापुढचा बिगबॉस सिझन होस्ट करणार नाही असा खुलासा केला आहे. सलमान खान गमतीने म्हणाला की, फायनलमधील स्पर्धकांना वाटत असेल की ते इथपर्यंत पोहोचले असल्याने जिंकण्यात किंवा हरण्यात काही अर्थ नाही, पण तसे अजिबात नाही. हे ऐकून सगळे हसू लागले. पुढे तो म्हणाला की, दररोज घरात राहणे खूप कठीण आहे आणि टॉप ६ मध्ये पोहोचलेल्या प्रत्येकाचा त्याला अभिमान आहे. मी सुद्धा शोचे १५-१६ सीझन होस्ट केले आहेत. पण आता पुढचा सीझन करणं शक्य नाही.’ तसेच पुढे तो म्हणाला की, ‘मी खूप खूश आहे. आज स्टेजवर येण्याचा माझा शेवटचा दिवस आहे. विजेत्याचा हात उचलण्याची आणि माझी जबादारी पूर्ण करण्याची मी वाट पाहत आहे,’ असे सलमान म्हणाला. मात्र, सलमान हे मस्करीत म्हणाला की, खरंच तो हा शो सोडणार आहे याबद्दल प्रेक्षकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.



सलमान खानने २०१० मध्ये सीझन ४ पासून हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली. मात्र, दरम्यानच्या काळात संजय दत्त, करण जोहर, अर्शद वारसी आणि अमिताभ बच्चन यांसारख्या इतर अनेक स्टार्सनीही हा शो होस्ट केला. पण चाहत्यांची पसंती नेहमीच सलमान खानच राहिला आहे.दरम्यान, गेले काही महिने सलमानसाठी खूप कठीण गेले आहेत. त्याची प्रकृती, लॉरेन्स बिश्नोईकडून सतत येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या या सगळ्यामुळे सलमानचं कुटुंब चिंतेत आहेत. मात्र असे असतानाही त्याने बिग बॉस १८ चे शूटिंग पूर्ण केले.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास