Rishabh Pant LSG Captain : ऋषभ पंत बनला लखनऊ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार

मुंबई : येत्या २१ मार्चपासून आयपीएल २०२५ चा थरार सुरु होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ हळूहळू त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर करत आहेत. आता लखनऊ सुपर जायंट्स संघानेही आपला कर्णधार जाहीर केला आहे. ऋषभ पंत लखनऊ सुपर जायंट्स संघाचा नवा कर्णधार असणार आहे.





लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतसोबत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, हा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज संघाची जबाबदारी सांभाळेल. या घोषणेसोबतच, संजीव गोयंका यांनी दावा केला की ऋषभ पंत केवळ या संघाचाच नाही तर संपूर्ण आयपीएलचा महान कर्णधार असल्याचे सिद्ध होईल. २०२५ च्या आयपीएलमध्ये ऋषभ पंत लखनऊचे नेतृत्व करेल हे निश्चित मानले जात होते. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला लिलावात २७ कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली होती.ऋषभ पंत २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनला. पण २०२४ नंतर ऋषभ दिल्लीपासून वेगळा झाला. त्यानंतर तो लखनऊ संघात सामील झाला आणि आता त्याचे ध्येय संघाला चॅम्पियन बनवणे असेल. लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल २०२२ पासून खेळत आहे. २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलने केले होते. यावेळी लखनऊ संघ नवीन आशा घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या नवीन कर्णधाराकडून खूप अपेक्षा असतील.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स