Rishabh Pant LSG Captain : ऋषभ पंत बनला लखनऊ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार

मुंबई : येत्या २१ मार्चपासून आयपीएल २०२५ चा थरार सुरु होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ हळूहळू त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर करत आहेत. आता लखनऊ सुपर जायंट्स संघानेही आपला कर्णधार जाहीर केला आहे. ऋषभ पंत लखनऊ सुपर जायंट्स संघाचा नवा कर्णधार असणार आहे.





लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतसोबत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, हा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज संघाची जबाबदारी सांभाळेल. या घोषणेसोबतच, संजीव गोयंका यांनी दावा केला की ऋषभ पंत केवळ या संघाचाच नाही तर संपूर्ण आयपीएलचा महान कर्णधार असल्याचे सिद्ध होईल. २०२५ च्या आयपीएलमध्ये ऋषभ पंत लखनऊचे नेतृत्व करेल हे निश्चित मानले जात होते. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला लिलावात २७ कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली होती.ऋषभ पंत २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनला. पण २०२४ नंतर ऋषभ दिल्लीपासून वेगळा झाला. त्यानंतर तो लखनऊ संघात सामील झाला आणि आता त्याचे ध्येय संघाला चॅम्पियन बनवणे असेल. लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल २०२२ पासून खेळत आहे. २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलने केले होते. यावेळी लखनऊ संघ नवीन आशा घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या नवीन कर्णधाराकडून खूप अपेक्षा असतील.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या