Rishabh Pant LSG Captain : ऋषभ पंत बनला लखनऊ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार

मुंबई : येत्या २१ मार्चपासून आयपीएल २०२५ चा थरार सुरु होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ हळूहळू त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर करत आहेत. आता लखनऊ सुपर जायंट्स संघानेही आपला कर्णधार जाहीर केला आहे. ऋषभ पंत लखनऊ सुपर जायंट्स संघाचा नवा कर्णधार असणार आहे.





लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतसोबत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, हा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज संघाची जबाबदारी सांभाळेल. या घोषणेसोबतच, संजीव गोयंका यांनी दावा केला की ऋषभ पंत केवळ या संघाचाच नाही तर संपूर्ण आयपीएलचा महान कर्णधार असल्याचे सिद्ध होईल. २०२५ च्या आयपीएलमध्ये ऋषभ पंत लखनऊचे नेतृत्व करेल हे निश्चित मानले जात होते. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला लिलावात २७ कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली होती.ऋषभ पंत २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनला. पण २०२४ नंतर ऋषभ दिल्लीपासून वेगळा झाला. त्यानंतर तो लखनऊ संघात सामील झाला आणि आता त्याचे ध्येय संघाला चॅम्पियन बनवणे असेल. लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल २०२२ पासून खेळत आहे. २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलने केले होते. यावेळी लखनऊ संघ नवीन आशा घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या नवीन कर्णधाराकडून खूप अपेक्षा असतील.

Comments
Add Comment

मेस्सीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या गोंधळाची चौकशी एसआयटीकडे; अटकेची संख्या ६ वर

कोलकाता: अवघ्या फुटबॉल विश्वाला आपल्या कवेत घेऊन फिरणारा अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉल कर्णधार लिओनेल मेसी

आयसीसी टी - २० क्रमवारीत वरुण चक्रवर्तीचा डंका

अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत स्थान मुंबई : भारतीय संघाचा मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आयसीसीच्या ताज्या

जय माता दी, शिवाभिषेक आणि बरचं काही... मेस्सीला भारतीय संस्कृतीची भुरळ

जामनगर: दिग्गज फुटबॉल पट्टू लिओनेल मेस्सी याचा भारतीय दौरा संपुष्टात आला असून तो आपल्या मायदेशी परतला आहे. दोन

धुक्यानं वाट लावली, लखनऊची टी ट्वेंटी रद्द झाली

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील लखनऊचा सामना

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

मुंबई : आयपीएल २०२६ तब्बल ६७ दिवस चालणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखांनुसार आयपीएल २०२६ ची सुरुवात २६

धुक्यात हरवली लखनऊची टी ट्वेंटी

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील आजचा लखनऊ येथे