Mumbai Trident Hotel : मुंबई हादरली! आलिशान हॉटेलमध्ये आढळला ६० वर्षीय महिलेचा मृतदेह

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने आजुबाच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



मुंबई हे शहर गजबजलेल्या शहरांपैकी एक आहे. फिरण्याच्या तसेच उदरनिर्वाह करण्याच्या उद्देशाने अनेक लोक मुंबईत येतात. मुंबईत राहण्यासाठी हजारो नामांकित हॉटेल गरजूंसाठी उपलब्ध असतात. अशाच एका नामांकित हॉटेलच्या रूम मध्ये विसावलेल्या ६० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. मुंबईतील हॉटेल ट्रायडंट मध्ये हा मृतदेह सापडला असून मृत महिलेचं नावं विनती मेहतानी असल्याचं समजत आहे. ही महिला २७ व्या मजल्यावरील या रूम मध्ये ६ जानेवारीपासून एकटीच राहत होती. रूम क्लिनिंग साठी गेलेल्या कर्मचाऱ्याला प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने मास्टर किने दरवाजा उघडून बघताच आतमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून या महिलेचा मृत्यू नैसर्गिक झाला की तिने स्वतः आत्महत्या केली आहे याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा