Mumbai Trident Hotel : मुंबई हादरली! आलिशान हॉटेलमध्ये आढळला ६० वर्षीय महिलेचा मृतदेह

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने आजुबाच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



मुंबई हे शहर गजबजलेल्या शहरांपैकी एक आहे. फिरण्याच्या तसेच उदरनिर्वाह करण्याच्या उद्देशाने अनेक लोक मुंबईत येतात. मुंबईत राहण्यासाठी हजारो नामांकित हॉटेल गरजूंसाठी उपलब्ध असतात. अशाच एका नामांकित हॉटेलच्या रूम मध्ये विसावलेल्या ६० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. मुंबईतील हॉटेल ट्रायडंट मध्ये हा मृतदेह सापडला असून मृत महिलेचं नावं विनती मेहतानी असल्याचं समजत आहे. ही महिला २७ व्या मजल्यावरील या रूम मध्ये ६ जानेवारीपासून एकटीच राहत होती. रूम क्लिनिंग साठी गेलेल्या कर्मचाऱ्याला प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने मास्टर किने दरवाजा उघडून बघताच आतमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून या महिलेचा मृत्यू नैसर्गिक झाला की तिने स्वतः आत्महत्या केली आहे याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता